Friday, December 28, 2007

अडखळलेले शब्द ‍२

तोच जिंकणार होता, हे माहितच होतं
पण तो जिंकेल तेव्हा एवढं वाईट वाटेल असं वाटलं नव्हतं
द्वेष पसरवून जिंकता येतं असं?
सर्व काही आलबेल असल्यासारखं, अनिरुद्ध, द्वेष, दहशत नि विजयोन्माद
नि माझे अडखळलेले शब्द.

नवीन काहीच नव्हतं
फक्त ते इतिहासातून वर्तमानात आलं होतं
नि मी तेव्हा तिथे होतो एवढंच.
कसं जमतं काळाला हे असं बारीक सारीक अलगद पकडून पुन्हा पुन्हा उभं करणं?
हे असं उभं करत करत फक्त पुढे जाणारा काळ
नि माझे अडखळलेले शब्द.

हुकूमशाहीच्या उदयाची कारणे
भ्रष्ट प्रशासन, लोकनियुक्त प्रतिनिधींवरचा उडलेला विश्वास इ.
उत्प्रेरकेः
आत्यंतिक राष्ट्रवाद, द्वेष
हीच गोष्ट मी जर्मनीतल्या हिटलरची म्हणून वाचली होती.
ती गुजरातमधल्या नरेंद्राची म्हणून पुन्हा पाहिली इतकंच.
सारं काही माहित असलेलं
कृष्णधवल चित्रांतून आता रंगीत चलचित्रात दिसावं
नि माझे अडखळलेले शब्द.

कशी जुनीच गोष्ट नवीन वाटते
कधी बाहेर पडू नये असं वाटतं
नि कधी बाहेर पडण्याचा मार्गच दिसेनासा होतो.
हतबलतेचा कडेलोट
नि माझा शब्दातीत dyslexia
अर्थात माझे अडखळलेले शब्द.

अडखळलेले शब्द ‍१

नवर्‍याला दोन अंड्यांचं आँम्लेट, मोठ्या मुलालाही तसंच नि धाकट्याला मात्र एकाचंच, साधं, मिर्ची न घालता.
प्रत्येक फुटलेल्या अंड्याबरोबर वाढत जाणारा घड्याळाचा वेग, आईची धांदल
हे सगळं ईशानसारखं थंडपणे सहज पकडणारा दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार इ.
नि माझे अडखळलेले शब्द.



तीन गुणिले नऊ बरोबर?
कुणाला तीन असं लिहून जग सोडाच पण विश्व जिंकल्याचा आनंद.
त्यामागचा तर्क बघून आम्ही अवाक
नि तोंडात मारल्यासारखे
सत्तावीसवर माझे अडखळलेले शब्द.

बेधडक रस्ता क्राँस करताना अडखळणार्‍या प्रत्येक टँक्सीच्या ब्रेकसह चुकलेला ठोका
नि न अडखळता चालणारा ईशान
भरधाव धावणारी डबल‍ डेकर
नि माझे अडखळलेले शब्द.

"तुम्हें सब है पता" नि "मेरी माँ" यांच्यामध्ये थांबलेला तो क्षण
नि काठाशी येऊन थबकलेलं पाणी
"मेरी माँ" म्हणताच फुटलेले बांध
नि माझे अडखळलेले शब्द.

"मुहल्ले की रौनक गलियाँ हैं जैसे,
खिलने की जिद पर कलियाँ हैं जैसे"
प्रतिभेच्या कुठल्या शिखरावर मिळतात हे शब्द?
थेट हृदयाच्या तळाशी जन्माचे ठिकाण सांगणारा आनंद
नि कुणाचे कदाचित तिथूनच जन्मलेले शब्द
नि माझे अडखळलेले शब्द.

तोच जिंकणार होता, हे माहितच होतं
पण त्याने अशी मिठी मारून डोळे क्वचितच भिजवले होते
नि त्याचा मित्र एवढ्या निरागसपणे खूश होणार होता?
सर्व काही न अडखळता सांडणारं, आनंद, हास्य, अश्रू
नि माझे अडखळलेले शब्द.

नावाच्या पाट्या सरकताना नि निम्मं थिएटर रिकामं होत असताना
कदाचित बहुतेकांनी त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्षच केलं असेल
ती मुलं मात्र निखळ निरागसपणे हसत होती
"कभी बाते जैसे दादी नानी" म्हणताना मोठ्यांच्या चपला घालून ती चिमुकली चालत होती
नि काही जण मात्र जाणीवपूर्वक त्यांना पडद्यावर उभं करत होते.
कसं बारीक सारीक टिपतात काही जण
कशी आजूबाजूचीच गोष्ट नव्याने सांगतात काही जण
नि कशी नवीन दिसते ती त्यांच्या डोळ्यांतून बघताना
फक्त पहात रहावंसं वाटतं
डोळ्यांवरल्या पाण्याच्या पडद्याआडून
ते न थांबता झरणारं पाणी
एका अफाट सुंदर, अफाट निरागस नि अफाट प्रतिभेच्या जगातून बाहेर पडूच नये म्हणून चाललेली अथक धडपड
शब्दांतून कसं व्यक्त होतात त्या जगात?
माझा शब्दातीत dyslexia
अर्थात माझे अडखळलेले शब्द.

Friday, December 7, 2007

एक अर्धवट कविता

मी उन्हात होती प्याली
छाया ती वृक्षाखाली
ती ऊब शांत छायेची
पानांसह गळून गेली

जी ढगांत दडली माया
वर्षते पुरावा द्याया
शिशिराच्या मेघीं भोळी
गोठून जाय ती वाया

मी उन्हात होता प्याला
बर्फाचा काळा गोळा
त्याने थंडावा पोटी,
हिमवर्षावाने गोळा

ही वणवण नवीन नाही
ऊनही कोवळे नाही
पण शिरिषावाणी मोठी
शिशिराची माया नाही
.....

जी विहिर एकेकाळी
तापल्या उन्हाचीसुद्धा
तहान शमवत होती,
ती शाल हिमाची ओढून
पोटचे पाणी दडवून
गुपचूप बैसली होती.
.....

बाहेर विंटर सुरु झाला आहे, नावापुरता दिवस आहे अन्यथा अंधारच अधिक माजला आहे, लवकरच स्नो‍ पडणार आहे, तुम्ही आधीच जरा वैतागलेले किंवा निराश आहात असल्या परिस्थितीत ही कडवी पडली. त्यातून काहीच घडेना. म्हणजे पुढे काहिच नाही. उगीच आपलं स्वघोषित नैराश्य कुरवाळत बसायचं...मग तेच ते नि तेच ते निरनिराळ्या उपमा देत बरळत बसायचं...सुचेल काहितरी यातून अधिक गहिरं वगैरे...म्हणजे काय? याहून भीषण की उगीच "sugar coated weakness" सारखी त्याला उदात्त किनार द्यायची, का "हेही खरेच आहे" असली अगदीच अलिप्त वाक्यं फेकायची? समजेना म्हणून सोडून दिलं.

आणि स्नो झालाच...अगदी नको तेव्हा...मग अजून वैताग...लक्षणं अधिक भीषण कडवी पडण्याचीच होती.

तेवढ्यात कुणीसं म्हटलं, "स्नो पडतोय? सहीच...I am missing snow...मला पावसासारखाच स्नो हा शुभशकुन वाटत आलाय. एकदम आनंदी मूड निर्माण करणारा". अरेच्चा, हा असा कधी विचारच केला नव्हता. म्हणजे शकुनापशकुन अगदीच बकवास विचार होता. ते गेलं खड्डयात..पण पाऊस जसा मूड मस्त करणारा आहे तसा स्नो होऊ शकतो? हं...Interesting...हा जरा वेगळा प्रकार आहे. म्हणजे पावसाच्या पाण्यासारखाच स्नो साचलाय, सगळीकडे पांढरा चिखल आहे, आपण मद्दामून तो तुडवत आहोत, पावसात भिजावं तसं स्नोमध्ये खेळत आहोत, स्नो मुळे अतिपावसामुळे मिळावी तशी सुट्टी मिळाली आहे, नि आपण फक्त पाऊस बघावा तसा स्नो बघतोय, एकूणात मोसम सुहाना वगैरे आहे...चित्र तेच होतं पण कोण जाणे ते असं कधीच वाटलं नव्हतं...नि जेव्हा कळलं की हो...स्नो ही मस्त असू शकतो...तेव्हा स्वतःवर यथेच्छ हसून घेतलं...स्नो चा मातम फोल ठरल्यावर स्वतःच्या स्वतःच निर्माण केलेल्या भीषण परिस्थितीचा शोक त्याहून टुकार वाटू लागला... नि परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी ही कविता अर्धवटच सोडली...

याआधी अर्धवट राहिलेल्या कुठल्याही गोष्टीचं मला एवढं समाधान वाटलं नव्हतं.

Thursday, November 15, 2007

माळ

आलात कोठून दारी
गेलात गाऊन सारी
सहज गावची माझ्या
गाणी ती ओळखणारी

ती मधाळ मंजूळ वाणी
सांगते सुरेल कहाणी
घर, दार, पार, त्या चिंचा
ती वाट, घाट, ते पाणी

वेली या फुलल्या आधी
की किलबिल झाली आधी
गाण्यावर डोले जाई
गंधात सूर त्याआधी

शिंपिला घाम मी माझा
अर्पिला देह मी माझा
तो गाव राहिला मागे
हा माळ जाहला माझा

पांथस्थ नभीचे कोणी
ओळखती खूण पुराणी
हा असाच अंथरलेला
गालिचा, नि अत्तरदाणी

सांगून घराची वार्ता
भिजवून लोचने जाता
जाताना म्हणता, गाऊ
तुमच्या कष्टांची गाथा

आंब्यावर वसंतकाळी
त्या गंधस्वरांच्या ओळी
बुंध्याला ओळखणारा
मी तो कृतार्थ माळी

Saturday, November 10, 2007

धुआँ

धुआँ धुआँ धुआँ...

अंधेरी रातों से उठता
बादलों मे यूँ घुलता
माहताब इसमे खोता...

रात गहरी सोती इसमे
बात गहरी होती इसमे
साँस गहरी चलती जिसमे...

खामोशी का रंग ये कैसा
जलसे बुझते शोलों जैसा
जिनसे मचता शोर हो ऐसा...
धुआँ धुआँ धुआँ...

Tuesday, November 6, 2007

15 Park Avenue

(Note: Watching the movie 15 Park Avenue is a prerequisite. If you have not watched and may watch in the future, then do not read this post, as I may have detailed its suspense. If you are not going to watch it ever, for its too old now, then no harm reading ahead...but no guarantee that you will appreciate what I have written.)

The quest for something virtual – virtual objects, virtual places, virtual people...everything virtual. But, the quest – that is real – absolutely real. Everyone is looking for something, isn’t it? Something that they really want. But does something that you really want must also be real? If not, then does that search for something virtual is also virtual? Or just because you are searching something that exists makes your quest a real one?...

The list of questions goes on...I see the random blogs about this movie…People try to find answers…convert questions into suspense stories and try to decipher their farfetched observations and meaningless conclusions…I remember this dialogue from the movie:

Joydeep:… “She is looking for something, she can never find.”

Joydeep’s wife: “Aren’t we all?”

I smile…

Reality is always relative. We define something as real, if most of us feel the same – quite justified. But, should not we be sensitive enough to accept the fact that for someone that may not be real. What they are searching for might not be real with respect to the defined notions of reality but, that in no way makes their journey in their world less real.

Seeing Saddam hanged on television, surely disturbed me. I surely felt it was a political and legal murder. But, Mithi reacted like losing someone from her family. His silence used to talk to her…and for someone with no trustworthy person around, that must have been surely a hope. She lost her hope and reacted wildly. When it was evident that a person has been victimized and killed politically, wasn’t her reaction of being so helpless the most apt one? And then doesn’t that take her closer to reality than us? Again a list of questions…

End: Mithi finds 15 Park Avenue. She has found what she was looking for…for years. Her sister, her fiancée, her doctor are trying to find her. They are now asking people, “Do you know where 15 Park Avenue is?”

Now, why are these normal people searching for something they always knew was virtual? Or, just because someone else found it, made them think that it may not be virtual? So whose quest finally succeeded…Mithi – who found her virtual world or others – who were living in the so called real world? And why these normal folks suddenly lost all the sense of reality and started searching for something that never existed? Questions with in built answers!And practically where did Mithi go? Or, would she be spotted one day somewhere roaming around like that mentally challenged woman outside their house? Does she also have a tragic story like Mithi?

I stop thinking, afraid to think more about real questions. I click on the Real player icon on desktop...play an old classic…Asha’s voice …as melodious as always…and Saahir at his best…I start humming…

"...जो खत्म हो किसी जगह, ये ऐसा सिलसिला नही..."

Saturday, October 27, 2007

मी एन. एम.

...

(उत्तरार्ध)

"...लोकांना इतरांचं बरं पाहवत नाही. मला इतक्या लोकांनी प्रशस्तिपत्रकं दिली. भारतातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ज्योति बसू बंगालचे मुख्यमंत्री होते नि असे बरेच, तेव्हा कोणी अशी अखिल भारतीय मुख्यमंत्री स्पर्धा घेतल्याचं कधी ऐकिवात नाही आलं. काम करण्यासाठी त्यांना काय इन्सेंटिव होतं कुणास ठाऊक? तर आमच्या राज्यातल्या लोकांचं जरा बरं चाल्लंय नि तसं सगळे म्हणताहेत तर काहींना ते पाहवत नाही. अर्थात हे काही नवीन नाही. पण उगीच निवडणूकांच्या तोंडावर असं काही आलं कानावर, तर नाही म्हटलं तरी जरा काळजी वाटतेच ना. म्हणजे मी किती वाईट, हे किती वेळा उगाळणार आहेत हे लोक. आम्ही आमच्या राज्यातल्या तमाम जनतेचे घडे पालथे घातले, तरी हे पाणी ओतायचं थांबत नाहीत. असू देत. कर नाही त्याला डर कशाला? म्हणून आमच्या राज्यात आम्ही कायदाच केला. प्रश्न विचारायला कुणी हात वर केला कि तो लगेच छाटून टाकायचा. माझ्या काही इतर योजनांच्या अंमलबजावणीबद्दल या प्रशस्तिपत्रकदात्यांनी कौतुक केलंच आहे. तसाच हा कायदा. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर आता मी म्हणू शकतो, "कर नाही त्याला डर कशाला?"

मागे २००७ सालच्या निवडणूका झाल्या, तेव्हासुद्धा असाच धुरळा उडवत होते हे लोक. परझानियाच्या प्रदर्शनावर निर्बंध घातले, तहलकाचा फार तहलका होणार नाही म्हणून टीव्ही बंद केले, आमीरचे चित्रपट बंद केले, अभ्यासाची पुस्तकं बदलली नि असं बरंच काही केलं. तरी यांची ओरड चालूच. म्हणजे देशातल्या इतर लोकांना जे आधीच कळतंय नि बर्‍याच अंशी वळतंय, त्यांनाच पु्न्हा पुन्हा ते सांगण्यात का उगाच श्रम, पैसा नि वेळ हे लोक वाया घालवतात कोण जाणे. आमच्या राज्यावर नि त्यातल्या लोकांवर याचा काही एक परिणाम होणार नाही याची आम्ही संपूर्ण खबरदारी घेतो. म्हणजे तसंच झालं पाहिजे ना? राजाचं कामच आहे ते. लोकशाही वगैरे नंतर आधी स्वतःच्या नावाला जागलं पाहिजे माणसानं. मीही तेच करतोय. राज्याभोवती संरक्षक भिंती...रशिया सारख्या...छे...रशिया काय...हा डावरा किडा कुठून आला डोक्यात...

पण एकंदरित लोक व्यर्थ पैसा वाया घालवताहेत हे सगळं करून. २००७,२००१२ साली नाही झाला काही उपयोग तर आता काय होणारे? एवढा पैसा झालाय का लोकांकडे? आमचं केंद्रात सरकार होतं तेव्हा कसा थोड्यांकडेच होता पैसा. मध्यंतरी ते अर्थतज्ज्ञ पंतप्रधान झाले. त्यांनी उगीच सगळ्यांकडे पैसा हवा असा एकच घोषा लावला होता. नि ते मनावर घेऊन प्रयत्न करायचे. पुढे आमचं सरकार आलंच नाही केंद्रात पण त्यामुळे पैसा फार लोकांकडे आला. म्हणून त्यांना असल्या वायफळ गोष्टींत तो दवडायला फार आवडत असेल.

आमच्या राज्यात एवढी सुबत्ता. सगळे उद्योगधंदे येऊ लागले. त्यासाठी इंधन हवं म्हणून इराणहून तेलाची पाईपलाईन थेट आमच्या राज्यात आणण्याचा प्रस्ताव मांडला. एकदम शाँर्टकट होता. उद्योग वाढीस लागावेत म्हणून राजधानीच्या शहरात यद्यावत विमानतळ उभारला. मध्यपूर्वेतील काही नावाजलेल्या विमानकंपन्यांना इथे आँफिसेस थाटण्यासाठी जागा दिल्या. पण या लोकांनी त्यांच्या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेची हमी, त्यांच्या वसाहतींमध्ये प्रार्थनास्थळं असल्या अवास्तव मागण्या करायला सुरुवात केली. त्यांचं पाहून इतर परदेशी कंपन्याही नखरे करू लागल्या. इतका संताप आला होता मला. म्हणून मग फक्त देशी भांडवलाला प्रोत्साहन असा निर्णय घेतला. त्यानिमित्तानं केंद्राच्या नीतींना विरोधही करता आला. तर कम्युनिस्टांना मी त्यांचीच नीती चालवोतय असं वाटून उगीच सलगी दाखवायला लागले. म्हणजे मी न मागता उगीच लगट. नसता त्रास डोक्याला. मी डावरा वगैरे झालोय का हे बघायला डाव्या हातात पेन घेतलं. सरळ रेषा काढून बघितली. डाव्या हातात पेन घेतल्यावर ती रेषा नैसर्गिकपणे उजवीकडून सुरू होऊन डावीकडे थांबली...हिब्रू, उर्दू सारखी. हे काय अभद्र घडतंय म्हणून लगेच वही आगीत फेकून दिली.

पण काही म्हणा. स्वदेशात काही गोष्टी फार छान. म्हणजे या मुख्यमंत्री स्पर्धावाल्या संस्थांसारख्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर असं का नाही कुणी. काही मान्यता आहेत. पण एकूणात आंतरराष्ट्रीय निकषच वेगळे. त्यांना काम, भरभराट, प्रशासन एवढं पुरत नाही. त्यांना आमच्या रेझ्युमेवर सामाजिक बांधिलकी हवी; राज्यातील वातावरणात सांस्कृतिक, धार्मिक वैविध्य हवं; स्त्रिया, अल्पसंख्यांक विकासप्रक्रियेचा भाग हवेत; नि असं काहीच्या काही. म्हणूनच बाकीच्यांच्या नाकावर टिच्चून स्वतःच्या देशाची एवढी देदीप्यमान प्रगती होत असतानाही काही फालतू कारणांसाठी यांनी हिटलरला बदनाम केलं. काहीतरी घेऊन बसायचं मनात. हे सगळं काय करायचंय. कल्याणकारी राज्य संविधानात म्हणायला ठीक आहे. संविधानात तर आम्ही धर्मनिरपेक्ष नि समाजवादी आहोत असं पण लिहिलंय, नि बरंच काही. ते नाही पाळत तर कल्याणकारी राज्याचं काय एवढं. करायचीत काय लोकांची मतं वगैरे. विकास होतोय की नाही पहा डोळ्यात भरण्यासारखा...कम्युनिस्ट चीनसारखा...स्स्स्स्स...हे कुठलं डावरं भूत मानेवर येऊन बसलंय आज...

उद्या लगोलग नियम बदलले पाहिजेत. राज्यात सर्वत्र वाहतुकीच्या नियमांत बदल...आता "उजवीकडून चला". रेल्वेच्या रूळांवर जरा कठीण जाईल ते करणं पण. हे रेल्वेमंत्री अजून एक चौकशी समिती लावतील उगीच मागे. नि शिवाय त्यांचा धंदा नफ्यात आहे म्हणून राज्यातल्या काही नावाजलेल्या व्यवस्थापकीय प्रशिक्षण संस्थांत त्यांना मान आहे, म्हणून हात बांधले आहेत माझे. त्यामुळे रेल्वे सोडून.

सगळं असं आलबेल असताना हे असले विचार आले की आजकाल जरा उतारवयाचे वेध लागतात. जरा अंतर्मुख होतो. भीती वाटते. नाही नाही ते सुचतं...

त्वेषात कोरडा वारा, जलभार सोसुनी गेला
निःक्षात्र मेदिनी झाली, परशूच राहुनी गेला

भस्मासुरासही गर्वी वरदान शापसे झाले.
शापात सर्पदंशाच्या अहि जीभ चावुनी गेला.

बाप रे...

हे बाकीचे लोक म्हणतात ते खरं असेल तर असं काही वाढून ठेवलंय का आपल्यापुढे?...हिटलर, मुसोलिनीच्या यादीत बसवतात हे लोक मला. इटलीच्या लोकांविषयी मला विशेष प्रेम नाही पण हिटलर, मुसोलिनीच्या यादीत म्हणजे जरा अभिमानास्पदच आहे. पण आजकाल भलतंच मनात येतं...

फाशी मुसोलिनीचे ते इटलीत प्रेतही गेले
प्रारब्ध आज का माझे इतिहास सांगुनी गेला?

डावरा होण्यापर्यंत ठीक होतं, हे जरा जिवावरच बेततंय...असा एकटा पडलो तर शेजारी तरी थारा देतील का?...का तेही नाही....

राज्यात आज का राजा गुजराण शोधतो आहे?
रक्तात गुज्जरांच्या का दरबार वाहुनी गेला?

हा सगळा नाट त्या दिवसापासून लागलाय...तेव्हा काही वाटलं नाही त्याचं. पण पुन्हा पुन्हा तो प्रसंग आठवतो. वाटतं दाही दिशा उत्तरं मागताहेत. झोप नाही येत रात्र रात्र. कुठल्या तोंडाने द्यावं मी उत्तर? नि कुठल्या शब्दांत? आख्खं जग घालूनपाडून बोलतंय मला. बाप दाखव म्हणतात. माझ्याकडे काही कवचकुंडलं नाहीयेत त्यांच्याशी दोन हात करायला. एक नकोशी व्यक्ती मारली की दुसरी जन्म घेते. आत्तावर राज्यातली जनता शहाणी आहे. निमूट ऐकतेय माझं. पण तो तसला प्रसंग परत घडला नि लोक फिरले तर...एक चँनल...दोन चँनल...कितींची तोंडं बंद करणार?...छे...लोकांना बरं पाहवत नाही हेच खरं...

यज्ञात काल मी माझ्या हृदयास अर्पुनी आलो
का दान दोन शब्दांचे मज "कर्ण" मागुनी गेला?

Saturday, October 6, 2007

खरंय!

मी पडलो होतो, हेही खरेच आहे
मी चिडलो होतो, हेही खरेच आहे
एकटा एकदा, नजरा चुकवत, रुक्ष मनाने
मी रडलो होतो, हेही खरेच आहे

मी असे बोललो, हेही खरेच आहे
मी तसे बोललो, हेही खरेच आहे
बोलणे खुंटता, मूक बोल हे, उघडपणाने
मी कसे बोललो? हेही खरेच आहे

जग भकास होते, हेही खरेच आहे
मन उदास होते, हेही खरेच आहे
थांबल्या क्षणांचे, बेटावरले, खुल्या दिशेने
ते प्रवास होते, हेही खरेच आहे

मी कधी आलो, हेही खरेच आहे
मी कधी गेलो, हेही खरेच आहे
जाता येता, सांजसकाळी, हमरस्त्याने
मी कुणा दिसलो, हेही खरेच आहे

Wednesday, October 3, 2007

जे जे उत्तम...

मेघना टँग केल्याबद्दल धन्यवाद. इथे अमेरिकेत माझ्या हातात दोनतीनच पुस्तके आहेत, त्यामुळे तेवढेच पर्याय आहेत...शिवाय मी कुणाला खो द्यावा हा प्रश्नच आहे. पण धावत राहतो कुणाला खो देईपर्यंत...
........................................................................................................................................................................



"परमेश्वराचे स्वरूपच मुळी ज्ञान, असे भारतीय संस्कृतीत सांगितले आहे. परमेश्वराची, ब्रह्माची व्याख्या काय? "ज्ञानम् ब्रह्म" - ज्ञान म्हणजे ब्रह्म. ज्ञान म्हणजेच परमेश्वर. ईश्वराची याहून थोर व्याख्या जगाला कोणी दिली नाही. ईश्वराची उपासना करणे म्हणजे ज्ञानाची उपासना करणे, ज्ञानाची उपासना अनंत रूपांनी करणे। समाजशास्त्र असो, खगोलशास्त्र असो, भूगोल असो, इतिहास असो, आयुर्वेद असो, तत्त्वज्ञान असो, योग असो, कर्मयोग असो, गणित असो, संगीत असो, ती ती ज्ञानस्वरूप परमेश्वराचीच पूजा होय. एकाच ज्ञानसूर्याचे हे अनंत किरण आहेत. महाभारतातील श्लोकांइतकीच गणितातील प्रमेयेही पूज्य आहेत. श्रुति‍‍-स्मृतींच्या अभ्यासाइतकेच सृष्टिशास्त्राचे अध्ययन पवित्र आहे. सनातन धर्मातील ही थोर दृष्टी आपण पुन्हा उचलली पाहिजे. भारतीय संस्कृती तरच पुन्हा नवतेजाने नटेल. आज संस्कृतिरक्षणाच्या चळवळी होत आहेत. नवीन विचारांचे वारे येऊ नयेत म्हणून सनातनी नावाची मंडळे किल्ले-कोट बांधू पाहात आहेत. परंतु हे संस्कृतिरक्षक नसून संस्कृतिभक्षक आहेत. भारतीय संस्कृतीचे मढे ते कवटाळू पाहत आहेत व आतील प्राण गुदमरवीत आहेत. हे सनातनी नसून अ‍-सनातनी आहेत.


सनातन या शब्दाचा अर्थच काय? "सनातनो नित्य नूतनः|" जे नेहमी नवीन नवीन स्वरूप प्रकट करील तेच टिकेल. ज्या झाडाला नवीन पालवी फुटेनाशी झाली, ते झाड मरणार असे समजावे. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात ज्ञानेश्वर म्हणतातः

"हे नित्यनूतन देखिजे| गीतातत्त्व||"


गीतेतील शब्दांचे अर्थ निरनिराळे दिसू लागतील. कारण त्या शब्दांकडे आज विसाव्या शतकातील परिस्थितीतून आपण पाहणार. अर्थाचा विकास होत असतो. शब्द लहान असतो, परंतु त्यातील अर्थ अनंत आहे. विचारांची उत्क्रांती सदैव होत असते.
भारतीय संस्कृतीची भव्य इमारत नवीन विचारांच्या वार्‍याने पडेल, अशी का या संस्कृतिरक्षकांना भीती वाटते? या नवीन विचारांच्या वार्‍यांनी जर ती पडण्यासारखी असेल, तर ती टिकण्यात तरी अर्थ काय? जरा आलेली वार्‍याची झुळूक ज्याला सहन होत नाही, तो क्षयी लवकरच मरणार, असाच नाही का ध्वनी निघत? भारतीय संस्कृती का अशी लेचीपेची आहे? आमच्या दृष्टीने ती तशी नाही. ज्ञानावर, अनुभवावर ज्या संस्कृतीचा पाया रचला आहे., त्या संस्कृतीला कधीही भय नाही. किल्लेकोट बांधून, भिंत बांधून ती बुरखा घेऊन बसणार नाही. हे बुरख्यातील बावळट पावित्र्य भारतीय संस्कृतीस नको आहे. नवीन विचारांचे भारतीय संस्कृतीस वावडे नाही. जगातील कोणतीही अनुभवाच्या कसोटीवर उतरलेली, ज्ञानावर उभारलेली संस्कृती आणा, भारतीय संस्कृतीचा तिच्याशी विरोध नाही.
जगातील प्रयोगांचा भारत उपयोग करून घेईल. भारतीय संस्कृतीचे दरवाजे मोकळे आहेत. साम्यवादाचे विचार आले, तर त्यात श्रीकृष्णाचे बालचरित्र भारतीय संस्कृतीस दिसेल. गोकुळातील लोणी चोरणारा श्रीकृष्ण, सर्व पददलितांची बाजू घेणारा श्रीकृष्ण, सर्व साम्राज्ये धुळीस मिळवणारा श्रीकृष्ण, त्याचेच दर्शन साम्यवादात भारतीय संस्कृतीचा आत्मा ओळखणार्‍यास होईल. "सत्याअसत्याशी मन केले ग्वाही" असे म्हणणार्‍या तुकारामाचेच दर्शन, "स्वतःच्या बुद्धीला पटेल ते करा" असे सांगणार्‍या ध्येयवादी नवविचारवंतात खर्‍या संस्कृतीच्या उपासकाला घडेल ! भारतीय संस्कृतीस भीती, नाश व मरण हे शब्द माहीत नाहीत. कारण ज्ञानाला नाश नाही, आणि ज्ञानावर ही संस्कृती उभी आहे."
-- साने गुरुजी, "भारतीय संस्कृती", १९३७.

Friday, September 28, 2007

एका तळ्यात...

दोस्तांतला कुणी कधीच हरला नाही
एकांत बोचरा सरात सरला नाही

पाण्यात पाहुनी नभात उडता कोणी
आधार द्यावया जळी उतरला नाही

खोळंबले कधी सुवर्णकण अस्ताशी
संधिप्रकाश तो पुन्हा पसरला नाही

रात्रीस काजवे खुशाल लपले रानी
अंधार साथ ही कधी विसरला नाही

पंखांत चंद्र तो जरा वितळला रात्री
सूर्यास पाहता परांत ठरला नाही

Sunday, September 16, 2007

सेतू बांधा रे सागरी

||श्री||

प्रति
राष्ट्रीय सचिव,
क्ष डावी चळवळ,
यांसी

स.न.

महोदया/महोदय,

सामाजिक, राजकीय, बिनराजकीय सामाजिक, बिनसामाजिक राजकीय, व सामाजिक-राजकीय अशा सर्व डाव्या चळवळींचा शुभचिंतक या नात्याने मी आपणास हे अनावृत्त पत्र लिहित आहे. राजकीय क्षेत्रात घडत असलेल्या काही घडामोडी या पत्रामागच्या प्रेरणा ठराव्यात. मी जो हा लहान तोंडी मोठा घास घेत आहे, त्याबद्दल सुरुवातीलाच क्षमा मागतो. पण काही घटनाच अशा घडत आहेत की त्यांच्यापासून धडा घेऊन मागील चुका सुधारून पुढील वाटचाल करणे हितावह ठरावे. त्यासाठी हा पत्रप्रपंच करत आहे.

आंदोलनांदोलनांतून आंदोलने करताना आपण त्या त्या प्रसंगी लिहिलेल्या सोडचिठ्ठ्यांतील पाल्हाळ हा माझा प्रांत नसल्यामुळे मी थेट विषयाकडे वळत आहे. तर मुद्दा असा की, हल्लीच गीत रामायण मधील "सेतू बांधा रे सागरी" हे गीत मी अनेकविध गळ्यांतून ऐकले. काही जण सागरी सेतू बांधून दोन सागर जोडण्याबद्दल सांगत होते, तर काही वानरसेना कुठल्याशा नैसर्गिक सेतूसदृश भूभागावर आपला वारसाहक्क सांगत होत्या. तदनुषंगाने प्रसिद्धीमाध्यमांतून अवगत ज्ञानाच्या आधारे केलेल्या काही नोंदींवर आपल्याशी विचारविनिमय मी या पत्राद्वारे करत आहे. पत्राच्या पूर्वार्धात मी काही स्थानिक समस्या त्यांवर मार्ग निघावा या हेतूने आपल्यासमोर मांडत आहे. उत्तरार्धात या समस्यांच्या उत्तराच्या आधारे काही व्यापक प्रश्न कसे हाताळता येतील यावर मी माझे मतप्रदर्शन केले आहे.

तर उपरोक्त भूभाग हा नैसर्गिक असून त्याचा सेतूसदृश आकार हा केवळ योगायोग आहे व या सेतूच्या निर्माणकार्याचा कुठलाही पुरावा नाही अशा अर्थाचा खुलासा न्यायालयासमोर सादर करण्यात आला. परंतु काही लोकांच्या मते हा सेतू श्री. राम कौसल्या दशरथ यांच्या पर्यवेक्षणाखाली श्री. हनुमान अंजनी पवन या मुख्य अभियंत्याच्या हाताखालील फौजेने बांधला. त्यांनी तसेच काही उच्चपदस्थ सत्ताधिकार्‍यांनीही तो सेतू अशाप्रकारे बांधला गेलेला नाही या सरकारी दाव्याचा आधार काय असे विचारून त्या सरकारी दाव्यावरच आक्षेप घेतला आहे असे कळले. माझ्या मित्राच्या पणजोबांनी मौजे धर्माचा पाडा खु., ता. शहापूर, जि. ठाणे येथे एक गणपतीचे देउळ बांधले. गणपतीची मूर्ती स्वयंभू असून अनेक भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. त्याच्या पणजोबांपासून सर्व पिढ्या याच देवळातील एका खोलीत रहात आल्या आहेत. सदर जमीन ही मुंबई महापालिकेच्या प्रस्तावित मध्य वैतरणा धरण प्रकल्पात प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहे. असंख्य भाविकांच्या भावनांचा आदर करून हा प्रकल्प थांबवावा अशी मागणी केली असता "मंदिरातील मूर्ती हा केवळ एक नैसर्गिक खडक असून ती गणपतीसारखी दिसत नाही, सबब ही मागणी निराधार आहे" असा युक्तीवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. तसेच सातबारा नाही म्हणून कुठलाही मोबदलाही नाकारण्यात येत आहे. त्या मूर्तीत गणपती नाही असे सिद्ध करणारा पुरावा सरकारकडे आहे काय? जमीनीवर हक्क शाबित करणे भूधारकांना आवश्यक नसून जर मोबदला द्यायचा नसेल तर त्या भूधारकांचा हक्क सदर जमीनीवर नाही हे सिद्ध करणारा सातबारा सादर करणे सरकारवर बंधनकारक आहे, अशी तरतूद कायद्यात आहे काय? या प्रश्नांची माहितीच्या अधिकारात अधिक माहिती काढून आम्हास सहकार्य करण्याची मी आपणास नम्र विनंती करत आहे.

याच आधारवर काही महत्त्वाच्या चळवळींना दिशा लाभावी म्हणून काही सूचना येथे करत आहे. त्यांवर आपण व आपल्या समविचारी साथींनी साकल्याने विचार करावा ही विनंती.

१) वरील प्रश्नाच्या आधारे एक मोठी चळवळ संपूर्ण ठाणे जिल्ह्यात उभी राहू शकते. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मुंबईतील खुर्चीचा मार्ग ठाणे जिल्ह्यातून जाणार असल्याने त्याचा राजकीय लाभही व्हावा.

२) श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झालेल्या वनाचा बराचसा भाग याआधीच सरदार सरोवर धरणाखाली नष्ट झाला आहे. निदान उर्वरित भाग तरी वाचावा व तो राष्ट्रीय वारसा म्हणून जतन करण्यात यावा या हेतूने या धरणाचे काम आहे त्या उंचीवर त्वरित थांबवावे अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात यावी. या मागणीला गुजरातसारख्या राज्यांतूनही व्यापक पाठिंबा मिळावा या हेतुने या चळवळीचे "दंडकारण्य बचाव आंदोलन" असे नामांतर करण्यात यावे. नामांतराला आपला नेहमीच पाठिंबा असल्यामुळे ही विनंती आपण उचलून धराल अशी आशा आहे.

३) श्रीराम‍, लक्ष्मण यांनी बाणगंगा जलाशय निर्मिला तेव्हा काही थेंब वाळकेश्वर येथून उडून नवी मुंबई, उरण व रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत पडले, अशी आख्यायिका नुकतीच ऐकिवात आली. हे प्रदेशसुद्धा राष्ट्रीय वारसा म्हणून जतन करण्यात यावे व त्यासाठी तेथील प्रस्तावित सेझ प्रकल्पांना मान्यता देऊ नये, अशी मागणी करण्यात यावी. उद्या हे असत्य आहे असा दावा करण्याचा प्रयत्न खाजगी क्षेत्रात काम करणारे माजी सरकारी अधिकारी करतील. "तो कुठल्या आधारे करण्यात आला अशी पृच्छा वरून होईल व आपली सत्ता जाईल" या भीतीने ते प्रयत्न हाणून पाडले जातील. शिवाय जनपथावरील दशमगृहाची सध्या कोकणच्या नेत्यांवर मेहेरनजर आहे असे म्हणतात. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोकणचा असणार असेही भाकीत मी ऐकून आहे. परिणामी या मागणीला विरोध संभवत नाही.

४) "रामराज्यात माझे पूर्वज रामाच्या दरबारात आचारी होते. आता सरयू नदीच्या पाण्यातही राम उरला नाही. रामाच्या नावाचा गजर करणारे काही जण ब्याण्णव साली आमच्या गावी आले होते. त्यांची कीर्ती ऐकून मी या गडावर आश्रयासाठी आलो. पण त्यांनीच मला कल्याण दरवाज्यात अडवून चोपले." अशी कैफियत परवा कोपर्‍यावरील भेळवाला भैय्या सांगत होता. कुठेच राम राहिला नाही असे मानणार्‍या या पीडितांचा वाढता पाठिंबा अशा चळवळींना मिळू शकेल.

५) रामभक्तांच्या संघांशी संगनमत करून चळवळींची उद्दिष्टे साधण्याची नामी संधी तीस वर्षांनी पुन्हा आली आहे. तिचा सदुपयोग करून घ्यावा. फक्त यंदा तुमच्या जीवावर त्यांना उभे राहू न देता, त्यांच्या जीवावर तुम्ही उभे रहाण्याचा शहाणपणा दाखवावा. आपापसातील मतभेद तूर्तास बाजूला ठेवावेत. अराजकीय भूमिका घेऊन अराजक माजवू नये. क्ष सेना, क्ष देशाचा कम्युनिस्ट पक्ष अशा समविचारी संघटनांनी यावेळेस तुमच्या बाजूने सलगी दाखवली तर त्यांना अस्पृश्य वागणूक देऊ नये. याच आधारे अनेक प्रश्न मार्गी लावता येतील. रामाप्रमाणेच इतर धर्मातील श्रद्धास्थानांबद्दल आख्यायिका प्रसृत कराव्यात. अशा श्रद्धास्थानांची संख्या लक्षात घेता एकतरी आख्यायिका चळवळीचे उद्दिष्ट साध्य करेलच. वेळ पडल्यास अं.नि.स.शी सध्या फारकत घ्यावी.

अशा माझ्या काही अनाहुत सल्ल्यांची कृपया मनाचा मोठेपणा दाखवून दखल घ्यावी. माझी काही प्रामाणिक मते मी येथे मांडली आहेत. आपला अनादर करण्याचा हेतू नसून, तसा झाला असल्यास दिलगिरी व्यक्त करतो.

धन्यवाद.

Tuesday, September 4, 2007

विषयांतर

नववीमध्ये असताना आम्हाला एक धडा होता, काळे केस. धडा आठवत नाही पण हे नाव आठवतंय. ते स्वाभाविक आहे, कारण त्या धड्यात एकही धड गोष्ट नव्हती. नुसता काही पानांचा असंबद्ध मजकूर. नि त्याला म्हणे लघुनिबंध म्हणतात. "बादरायण संबंधाने जोडलेल्या विभिन्न विषयांवरील अनेक लहान लहान लेखांचा दीर्घ एकसंध गद्य मजकूर म्हणजे लघुनिबंध", अशी एक प्रदीर्घ व्याख्या मी तेव्हापासून मनात बाळगून आहे. अजूनही काथ्याकूट करून ही व्याख्या लांब करण्याचा मला मोह होत आहे पण, "दीर्घसूत्री विनश्यति" या सुवचनाचे स्मरण करून मी तो मोह टाळत आहे. हे लिहितानाच, असाच एखादा दीर्घ लघुनिबंध वाचून कुण्या एका सुज्ञास हे वचन सुचले असावे का, असा प्रश्न मनात येत आहे. तर आपणही असा एक लघुनिबंध लिहावा असा एक विचार अनेक दिवस मनात आहे. एखाद्या क्षुल्लक गोष्टीवर विचार करताना वेगाने रूळ बदलून भलत्याच विषयावर घसरण्यात माझं मन प्रकाशालाही हार जात नसल्यामुळे आणि हे रूळ बदलणं केवळ वेगात नव्हे तर अव्याहत चालू राहू शकत असल्यामुळे आपण हा साहित्यप्रकार हाताळू शकू असा मला प्रचंड आत्मविश्वास आहे. त्याच जोरावर मी हे धाडस करत आहे.

आता काहीही लिहायचं हे ठीक असलं तरी कुठून तरी सुरुवात करावीच लागणार. म्हणजे काहीतरी आकर्षक सुरुवात हवी. बरंच काही वाट्टेल ते सुचतंय नि ते कुठल्या अदृश्य धाग्यांनी जोडायचं तेही. पण सुरुवात सुचेना. "अदृश्य धागे" या शब्दसमुच्चयाचा कुठलाही प्रगल्भ, काव्यात्म अर्थ न घेता शब्दशः अर्थ येथे अभिप्रेत आहे. लिखाण निःसंदिग्ध असावं या भावनेतून हा ऊहापोह. तर असं काहीही सुचतंय पण सुरुवात सुचेना. पुन्हा एकदा स्पष्टीकरण...या अथांग विश्वात आपण केवळ भरकटत आहोत आकाशगंगांसारखे, उगम आणि अंत याविषयी अनभिज्ञ...असा कोणताही प्रगल्भ अर्थ कटाक्षाने टाळावा. माझ्या लिखाणाची एवढी झेप नाही. विनय म्हणून नव्हे, वास्तव म्हणून. तर हे असं फारंच रटाळ सुरु झालंय. पण सुरुवात शोधता शोधता हे जे दोन परिच्छेद खरडले ते सुरुवात म्हणून ग्राह्य धरता नाही का येणार? असा एक कोंबडी आधी की अंडे आधी ढंगाचा प्रश्नही या निमित्ताने मला पडला आहे.

आताशा मला हे असे काहीबाही प्रश्न फार पडू लागले आहेत. म्हणजे आमचं काही कमावलेलं शरीर नाही. एकंदरीत अंगमेहनतीच्या कामात गती कमीच. पण तळाला लागलेली भांडी, "हे निघत नाही", असं खुशाल जाहीर करून रूममेट निघून गेल्यावर माझ्या हातून कशी बर्‍यापैकी लख्खं होतात? मुळात या बल्लवांचा रोज भात खाली लागतोच कसा? एकदा लागल्यावर पुढल्यावेळी पाणी जास्त नाही का घालता येत? बराच वेळ शिट्टीच झाली नाही, या गोष्टीची दखल बर्‍याच वेळानंतर घेण्यापेक्षा जरा आधी घेता येत नाही का? का शिट्टया ऐकूच येत नाहीत? मला कमी ऐकू येतं, मग मी उगाच प्रश्न विचारत राहतो यावर माझ्या मित्रमंडळींचं एकमत आहे. असेल बुवा. वास्तविक व्यासपीठावरून केलं गेलेलं, आपल्याला अडचणीत टाकणारं वक्तव्य आपण ऐकलंच नाही, असं सांगून कानावर हात ठेवणार्‍या महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांसारखी नामुष्की आमच्यावर आजवर कधी ओढवलेली नाही. हेच ते सर होते ना ज्यांनी मग आम्हाला नैतिक शिक्षण देण्याचा घाट घातला? तर असेल मला कमी ऐकू येत. पण घरात शिरल्या शिरल्या दारातच मला स्वयंपाकघरातील वाहत्या नळाचा नि बाथरूममधील निथळत्या शाँवरचा जो आवाज ऐकू येतो तो तेथे उपस्थित तमाम जनतेला का ऐकू येत नाही? किती पाणी वाया गेलं असेल या विचाराने येणारी अपार खिन्नता इतरांना का शिवतसुद्धा नाही? घरभाड्यात पाणी, वीज, इंधनाचा वायू इ. सुविधा मोफत मिळतात म्हणून त्यांचा वाटेल तसा वापर करणारे हे अमेरिकास्थित पैसा, शिक्षण, भारतातील सामाजिक स्तर या सर्वार्थांनी उच्चभ्रू भारतीय लोक आणि मोफत वीज वाटेल तसा वापरणारा भारतातील सामान्य शेतकरी यांची तुलना करण्याचा मोह मी इथे उपमा, उत्प्रेक्षा की रूपक अलंकार योग्य होईल या गहन विचारात सोडून देतो. तरीपण हा उधळण्याची वृत्ती जोपासणारा प्रकार चळवळ करून थांबवला पाहिजे असं मला वाटतं. भले मला स्वतःलाही माझ्या राहत्या घरासाठी घरभाड्याखेरीज अजून काही पैसे मोजावे लागतील. हरकत नाही. मी मोठ्या मनाने तो त्याग करीन. जमीन पुनर्रचनेसाठी कम्युनिस्टांनी दिलेल्या योगदानाप्रमाणे घरभाडे पुनर्रचनेसाठी मी दिलेल्या या योगदानाचे युगान् युगे कौतुक होईल का? या प्रसिद्धीपरायण प्रश्नावर मला माझीच कीव येत आहे. नि हा असला क्षुद्र विचार बँकस्पेस ने नाहीसा करावा की मागे जाऊन डीलीट ही कळ वापरून तो पुसावा असा मी विचार करत आहे.

"विंडोज"च्या "मँक" नावाच्या एका सावत्र बहीणीबरोबर एकदा काम करताना तिच्या पटलावार बँकस्पेस अशी कळच नाही नि डीलीट नावाची कळ बँकस्पेसचे काम करते हा जावईशोध मला लागला होता. मला तिची फारच दया आली होती तेव्हा नि मग तिच्यातून उगवलेलं ते पांढरंशुभ्र सफरचंद मला पांढरंफटक दिसू लागलं होतं. रंग आणि जोडशब्द यांचं या अर्थचमत्कृतींमुळे अतूट नातं आहे. परवा एक नवीन मराठी अल्बम ऐकताना "निळेभोर नभ तुझ्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये..." अशी ओळ ऐकून मी स्मित हास्य केलं होतं. काही लोक याला कुत्सित असंही म्हणतात. मला निळंशार माहित होतं. निळंभोरवर मी जरा घुटमळलो होतो. "एकतर निळेभोरवर एवढं खटकायचं काही कारण नाही नि शिवाय जर आपल्याला अशा कविता, गाणी लिहिणं झेपत नाही तर जे करतात त्यांच्यावर हसू नये" असं माझं मन मला ओरडत होतं. हे बरं आहे, जरा आमच्या कानाला खटकलं नि आम्ही हसलो तर एवढं काय त्यात? इंजिनिअरींगच्या तोंडी परीक्षांच्या वेळी आम्हाला केवळ मूक करण्याच्या हेतुने काही प्राध्यापक वाटेल ते विचारायचे, चुकीचंही. चूक आहे म्हणून सांगायची सोय नाही परत. तेव्हा आम्ही नाही कधी म्हणालो त्यांना ते की, "तुम्हालाही नाही येत हे, उगाच हसू नका". वास्तविक दोष त्यांचा नसे. स्वतःला फार शहाणे न समजणारा इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगचा शिक्षक नि काँप्युटर इंजिनीअरींगचा विद्यार्थी विरळाच ! काँप्युटर इंजिनीअरींगला प्रवेश घेतला की प्रवेशासह हा आगाऊपणा मोफत मिळतो. पण इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगच्या शिक्षकांच्या अंगचा "अहं सर्वास्मि" हा भाव कमावलेला असतो. त्यामुळे तो त्यांच्या हरएक कृतीत दिसून येतो. काँप्युटर इंजिनीअरींगचे शिक्षक बहुदा सतत न्यूनगंडाने ग्रासलेले असतात. काँप्युटर इंजिनीअरींगचा गंधही नसणारा माणूस आपला बँक अकाऊंट चालविण्यासाठी प्रणाली लिहून आपल्या तिप्पट पैसा ओढत आहे, "मी इतर नोकरी मिळाली नाही म्हणून नाही तर स्वेच्छेने शिक्षक झालो आहे " हा आव आणणे कठीण होत चालले आहे, आपल्या विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक आहे, आपले विद्यार्थी आपल्याला गुंडाळून टाकतात, अशा अनेक गोष्टींचा तो परिपाक असावा. काँप्युटर इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांच्या आगाऊपणाचे कहर ऐकून मला या शिक्षकांची अगदी कीव येत असे. इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगचं तसं नाही. इथे प्रत्येक शिक्षक स्वतःला अनभिषिक्त सम्राट समजतो आणि आपली प्रयोगशाळा नामक गढी राखत असतो.

इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगचे विद्यार्थी तर सतत बावरलेलेच असतात. एकतर आपण काय शिकत आहोत आणि इंजिनीअरींगनंतर नेमकं काय कारणार याचा शेवटपर्यंत पत्ता लागू देत नाहीत. मग काही धोपटमार्गी साँफ्टवेअरकडे जातात. त्यांना आपलं प्रोग्रामिंग दुसर्‍या सत्राच्या परीक्षेनंतर कधी पुढे गेलंच नाही ही भीती असावी. काही धिटाई दाखवून इलेक्ट्राँनिक्सकडे वळतात. तिथे इलेक्ट्राँनिक्सकच्या मुला‍‌मुलींशी स्पर्धा. नि काही राहिलेच इलेक्ट्रिकलमध्ये तर बहुदा त्यांना त्यांचे वरीष्ठ सांगत असतील की, "ती डि सी मोटर कोणी वापरत नाही आता. ए सी मोटर नि थ्री फेज ट्रान्सफाँर्मर महत्त्वाचं". मग त्यांना धडकी भरत असेल. या दोन गोष्टींवर त्यांच्या इंजिनीअरींगची मोटर आचके देत बंद पडली होती. मोटर चालू होताना ती प्रचंड करंट खेचते त्यामुळे ती शंभर गोष्टींची खातरजमा करून व अत्यंत सावधपणे चालू केली पाहिजे, हे त्यांच्या मेंदूवर इतकं ठसवलेलं असतं की ती बंद पडलेली मोटर पुन्हा चालू करण्याचं धाडस त्यांनी घाबरत घाबरतंच केलेलं असतं. त्या दिव्याची आठवण मनाला सुन्न करत असेल. अशा विपरीत परिस्थितींतही न डगमगता वीज, सर्किट व प्रोग्राम असं वाट्टेल ते पुरवू शकणार्‍या या विद्यार्थ्यांचं मला कौतुक आहे.

झाली पंचाईत आता? इंजिनीअरींगकडे वळू नको असं बजावत होतो. एकदा यात शिरल्यावर आता कुठल्याही विषयाकडे वळता येत नाही. या फक्त आत पावलं जाणार्‍या गुहेत, नव्हे गर्तेत, मी असा कृष्णविवरात खेचल्यासारखा पडतो. बाहेर पडायचा मार्ग नाही. कृष्णविवरेही मरतात व त्यांच्यातील माहिती नष्ट न होता अन्य स्वरूपात विश्वात राहते, असं स्टिफन हाँकिंग म्हणाले तेव्हा मला केवढा दिलासा वाटला होता. त्याच आशेने, या गोड आठवणीवर या दीर्घनिबंधाचे "विषयांतर" अशा समर्पक शीर्षकाने बारसे करून विषय अधिक न वाढवता थोडक्यातच इतिश्री करत आहे.

Sunday, August 26, 2007

लेणे

एक लेणे खोदीन म्हणतो
कोरीवकाम करीन म्हणतो
अतिसूक्ष्म
दगडाच्या कणालाही छेदणारं
विश्वाचं गूढ उकलणारं
काळ्या कातळात थंड गुहेत एकांतात बसेन म्हणतो
जगापासून अलिप्त दूर विश्वाचं रहस्य उलगडीन म्हणतो
तीक्ष्ण आयुधं तयार आहेत
सूक्ष्माचा वेध घ्यायला नजर माझी तीक्ष्ण आहे
काळा कातळ शोधत आहे
इतरत्र तो दिसत नाही
मनालाच कणखर बनणं प्राप्त आहे.

Thursday, August 9, 2007

निकड शांततेची आता कुणास आहे?
गजबजीत ऐका एकांत वाजताहे

अथक रोखणे हे तूफान व्यर्थ आहे
गलितपर्णराशी धारांत वाजताहे

गरज गर्जण्याची वार्‍यास काय आहे?
खवळली कधीची लाटांत गाज आहे

अनल भास्कराच्या गाभ्यात व्यर्थ आहे
तरुण रात्र आभा तार्‍यांत मोजताहे

गरज शीर्षकाची काव्यास काय आहे?
सहज अर्थवाही शब्दांत साज आहे

Sunday, July 29, 2007

शोध

अदृश्य वास्तवांना दृश्यात शोधणारा
अंधार सांधणारा मी आत्मसिद्ध तारा

हृदयास वेदनांचा आधार आज व्हावा
कंठात दाटलेला स्वरमेघ पाझरावा
पाशात प्राक्तनाच्या निजधाम शोधणारा...

थकव्यातल्या बळाने पायांत जोर यावा
भिनल्या निळ्या शिरांनी आरक्त बाहु व्हावा
विपरीत नियतीचा संदर्भ शोधणारा...

अंधार सावलीचा डोळ्यांत पेटवावा
डंकार नीरवाचा कानांत दुमदुमावा
निद्रिस्त इंद्रियांनी अज्ञात शोधणारा...

स्वप्नातल्या सरींचा तो थेंब ओघळावा
प्राशून तिक्त, मधु तो ओठांवरी झरावा
अव्यक्त प्रीतीसाठी प्रतिसाद शोधणारा...

संदिग्ध ढगांच्या ओळी

खूप वर्षांपूर्वी स्वप्न पाहिलं होतं. तेच उराशी बाळगून पुढे चालत होतो तेव्हापासून. कधी त्याच्या जवळ होतो कधी दूर. पण मी ते पाहत होतो. सदैव. कधी त्याला थेट भिडायचा विचार तर कधी आडवाटेने गवसणी घालण्याचा प्रयत्न. कधी ते नजरेतून निसटताना दिसलं की निराशा. कधी अचानक त्याचा भास झाला की पुन्हा आशा. मग त्या वाटेचीच ओढ. त्याच्या जितकं जवळ जावं तितकं ते दूर...मृगजळासारखं! पण ते दिसेल तोपर्यंत धावायचं. कधी कोणाची सोबत व्हायची. पण त्यांच्यात अथक पळायची जिद्द नसावी. ते दिसत नाही असं सांगून थांबायचे. त्यांना कुणी सांगितलं नव्हतं का की जर तुम्ही वाळवंटात गेलात आणि तुम्हाला मृगजळ दिसलं नाही तर त्या वाळवंटाला दोष देऊ नका, तर मान्य करा की तुम्ही आंधळे आहात. का ते फक्त मलाच दिसत होतं? पण माझ्यासाठी तर ते वास्तव होतं. का माझी कुवत नव्हती ते मृगजळ आहे हे समजून घेण्याची? एवढं खरं होतं की मी वाळवंटात फिरत होतो आणि मला ते स्वप्नं वास्तवात उतरवायचं होतं.

अनेकदा मनात स्वतःबद्दल शंका येत असत. अजूनही येतात. कधी त्या मनाला नि बुद्धीला अशा काही ग्रासून टाकत की एकदम जग अंधःकारमय वाटे. रोजच्या वाटांवरही पाय अडखळे. सवयीच्या गोष्टी नव्या वाटत आणि मग स्वतःबद्दलच्या शंका दाट होत. तसं मी ते स्वप्न दिवसाउजेडीही पहात असे. पण अशावेळी ते रात्रीसही दिसत नसे. भय अंधाराचं नव्हतं. ते स्वप्न दिसेनासं झालं याचं होतं. मग सावरून तो नाद सोडून वेगळ्या वाटा धुंडाळित असे. खूप दूर जायचा प्रयत्न करत असे. पण ते स्वप्न पुन्हा ओझरतं दिसे नि मी पुन्हा नव्या उमेदिने त्याच्यापाठी पळत असे.

अलीकडे असाच पळत होतो. बेभान. एकच ध्यास. तिथवर पोहोचायचा. कंबर कसून मेहनत घेत होतो त्यासाठी. एक संधी सोडत नव्हतो पुढे जायची. प्रथमच मला वाटतं होतं की हीच ती वाट जी आपण इतके दिवस शोधत होतो. वाट सोपी नव्हती पण ती चालणं अशक्यही नव्हतं. अनेकांची मदतही होत होती. अगदी अनपेक्षित. एकामागोमाग एक गोष्टी घडत होत्या. त्यातल्या सर्वच अनपेक्षित नव्हत्या. त्यासाठी फार पूर्वीपासूनची तयारी होती. पण वाटलं नव्हतं इतक्या अकस्मातपणे त्या इतक्या वर्षांपासून चोखाळलेल्या वाटा वाट वाकडी करून या वाटेला येऊन मिळत होत्या आणि माझा धीर वाढवत होत्या. प्रत्येक पाऊल जपून टाकत होतो. टप्प्याटप्प्यावर मार्ग निरखतहोतो. आता कोणतीही कसूर चालणार नव्हती. एक तप झालं होतं स्वप्नामागे धावता धावता. मी संपूर्ण शक्ती पणाला लावून निघालो होतो. शेवटचा टप्पा होता नि मी नजर खिळवून समोर बघत होतो. खंबीरपणे नि आत्मविश्वासाने.

अचानक वाट खुंटली. काय होतयं हे कळण्या आधीच सगळं संपलं होतं. ज्यांनी आधार दिला होता त्यांनी उत्तरादाखल वेगळ्या वाटा दाखवायला सुरुवात केली. मला काहीच सुचेना. ज्या आभाळाला मी गवसणी घालायला निघालो होतो तेच आज असं कोसळलं होतं. मी स्तब्ध उभा होतो. दिग्मूढ. मला लक्षात येत होतं की मी इतर वाटांचा नकाशाच विसरून पुढे आलो आहे. मला माहित नव्हतं काय करायचं. सभोवती काळोख नव्हता. मलाच दिसत नव्हतं. पहिल्यांदाच ते स्वप्न कायमचं निसटलयं असं वाटतं होतं. दिशांचे संदर्भ लागत नव्हते. आकाशात ढग होते. तेवढेच काय ते दिसत होते. पण तेही अर्थहीन. विस्कळीत आणि जटील. भोवताली फक्त वारा गर्जत होता. तो आज असा खवळला होता. पुन्हा वर पाहिलं तर निराळं आकाश. वार्याने विस्कटलेलं. नकळत ग्रेसच्या दोन ओळी आठवल्या...

संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्यावरती लाटांचा आज पहारा...

अनंत ध्येयासक्तीच्या किनार्यावर मी उभा होतो. किनारा माझाच. तिथवर येणारा मार्गही माझाच. मीच शोधलेला मुक्काम. पण मी स्वप्नात पाहिलेला किनारा असा नव्हता. तो अजून दूर आत असावा. उगाच मनाची समजूत. पटणारी. पुन्हा मी स्तब्ध. निःशब्द. समोर फक्त माझा मार्ग सीमित करणार्या अनंत लाटा. त्या माझा किनारा राखत होत्या की रोखत होत्या? ती आसमंतात घुमणारी गाज नि बधीर मी. त्या लाटा माझ्यावर आदळत होत्या. मला उद्ध्वस्त करण्यासाठी की मला स्वप्नातून जागं करण्यासाठी?
‍ ‍‍‍ ‍

Wednesday, July 11, 2007

एका रविवारची कहाणी

एका रविवारची कहाणी

पु.ल.नी एका रविवारच्या सकाळची कहाणी रंगवली होती. आमची रविवारची सकाळ ११ वाजता सुरू होऊन १२ वाजता संपते. त्यात विशेष काहीच घडत नाही. १२ वाजता सुरू होणारी दुपार रेंगाळत रेंगाळत साधारण ४ वाजेपर्यंत लोळत असते. त्यात घरी फोनवर बोलणे, आंघोळ, जेवण इत्यादि ओघाने येणारी कामे आणि प्रामुख्याने chatting चा पहिला अध्याय पूर्ण होतो. रविवारच्या रात्री सोमवारच्या चिंतेने ग्रासलेली भारतातील मंडळी या काळात online असतात. गावभरच्या गप्पा मारून "चला मी जातो आता...उद्या कामावर जायचं आहे...तुम्ही करा रविवार एन्जाँय" असा सल्ला देऊन एकेकजण निघून जातो. झोपायचं सोडून उगाच टंगळमंगळ करत बसलेल्या एखाद्या निशाचराला "brb" असं सांगून मी लँपटाँप बंद करतो.चार वाजले; बरचं काही करायचंय असं मनात म्हणतो नि थंड बसून राहतो.

अजून संध्याकाळ चढायची बाकी असते. रविवार चालू असतो. म्हणजे खरं तर काहीच चालू नसतं पण रविवार चालू असतो. जसजसा desktop चा कोपरा 4:50 PM वगैरे दाखवू लागतो तसा पहिला विचार डोक्यात येतो...संपला रविवार...काहीच केलं नाही आज. नुसता बसून होतो. Timepass भरपूर झाला पण त्यातून काही विरंगुळा वगैरे अजिबात झाला नाही. नुसता वेळ वाया गेला. असो. जाऊ देत. एक दिवस काही न करता बसून राहिलं तर काही बिघडत नाही. अजून आहे वेळ....त्यात थोडी कामं होतील. मग एखादा फोन. अमेरिकेतल्याच कोणातरी मित्रमैत्रिणीचा फोन. पुन्हा शिळोप्याच्या गप्पा. "पक रहा है यार..." हे एकच पालुपद दोन्ही बाजूंनी...हे फोन फार काळ चालतात. नि मग जेव्हा काहीच बोलण्यारारखं उरत नाही नि "और क्या चल रहा है?" हा प्रश्न जिभेवर येणंही बंद होतं तेव्हा फोन थांबतो. शनिवार रविवार फोन फुकट असण्याचा दुष्परिणाम आहे हा.वास्तविक दुष्परिणाम कसला? त्या वेळात तसंही काही रचनात्मक कार्य वगैर हातून घडणार नव्हतंच. पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून निर्माण झालेल्या साधनांचा फाजील चैनीसाठी यथेच्छ वापर करून मग त्यावर टिका करणे हा माझा एक आवडता छंद आहे.

तर फोन ठेवताना त्याच्यावरचं घड्याळ कृत्रिमपणे 6:00 PM असं काहीतरी दाखवू लागतं. मनात जरा गलबलतं...सहा वाजले. पुढचा विचार..संपला weekend. भारतात तो रविवारी रात्रीपर्यंत संपत नसे. इथे शुक्रवारीच तो घाईघाईत सुरू होतो नि रविवारी घाईघाईत संपू लागतो. दिवस संपला, रविवार संपला इथवर ठीक असतं पण weekend संपला हे जरा जड जातं पचायला. कारणही तशीच आहेत. सोमवारपासून शुक्रवारपर्यंत assignments, projects, laundry, रूम आवरणं, blog लिहिणं, काहीतरी वाचणं (अभ्यासाचं नि अभ्यासेतर), काहीतरी ऐकणं, कुणाला तरी फोन करणं, कुठेतरी जाणं, पुढच्या आठवड्याची तयारी करणं, आधीच्या weekend ची थकलेली कामं पूर्ण करणं, नवीन काहीतरी करणं असं सगळं येणार्‍या weekend साठी साठवून ठेवलेलं असतं. हे सगळं राहीलं करायचं. weekend फुकट गेला ह्या भावनेने आलेले नैराश्य. त्यामुळे उगाच स्वतःचाच तिरस्कार. मग वैताग. मग निरुत्साह. मग रिकामटेकडेपणा. नंतर weekend सारखा मोकळा वेळ पुन्हा मिळणार नाही उद्यापासून ही खंत. सोमवारची चिंता. म्हणजे weekend भर काहीच केलं नाही याचं दुःख आणि weekend सारखं काहीच न करता बसायला मोकळा वेळ आता मिळणार नाही याचंही दुःख. हळूहळू रात्र होते नि सगळे मनसुबे पुढच्या weekend वर ढकलून मी सोमवारच्या रहाटगाडग्याच्या चिंतेत झोपून जातो.

सोमवार ते गुरुवार संध्याकाळ होतच नाही. शुक्रवार‍ शनिवारी होते संध्याकाळ. रम्य वगैरे. विरत्या उन्हात संध्या, हिरवाईत न्हाली होती...शांत निळाईत तान्ह्या, तळ्यात उतरली होती....असं सुचतं काहीबाही...पण रविवारची संध्याकाळ यासारखा निरर्थक, निरुत्साही नि रटाळ काळ आयुष्यात दुसरा नसेल. आता इतके रविवार येऊन गेले पण हे मत काही बदलत नाही. काहीतरी करून हा वेळ घालवावा असा नेहमी विचार येतो. पण रविवार येईपर्यंत विचार करायला उसंत मिळत नाही आणि तो आला की हाही विचार पुढच्या रविवारवर ढकलून chatting चा शेवटला अध्याय पूर्ण करणे एवढंच काय ते त्या रविवारच्या संध्याकाळी होतं!

Saturday, July 7, 2007

Digitalization

Every other day, I open the ibnlive website to get more and more irritated. I used to think no one could irritate me more than the professional interrogator Mr. Karan Thapar, who almost does both the parts of the show, asking questions and answering them, without switching chairs. To my dismay, there is now Ms. Sagarika Ghose to add to the irritation. I would still bear it if the discussion would bear meaningful food for thought. But, nah…everyday they come up with extremely ambiguous, utterly meaningless and thoroughly convoluted questions that are supposed to have either yes or no answer. The questions are so well targeted towards the jingoistic cynical audience that you do not have to wait eagerly for the host to announce the result of so called SMS poll. Then the panel tries to discuss on that question and the host tries her best to resist them from speaking anything that does not fall into the category of either yes or no. I do not blame them. No one gave them the option of choosing, not choosing or defining the globalization. They now have to live with its repercussions, one of them – “digitalization”.

Let me explain, what is digital, for those, to whom its meaning is not so obvious. The entire digital revolution has its basis in the use of binary number system. It has only two numerals 0, 1 or in general, it represents everything under the sun using only two basic states as the decimal system would use ten states from 0 to 9. Fortunately, the nature does not restrict itself to such constraints. It manifests itself in the form of a continuum, which comprises of every possible state. Therefore, the whole attempt is to describe things, in the best possible manner, using some combination of two states. Now, I know it works nicely for machines but I have my reservations when it comes to humans. It was fine to an extent to think that this era is a digital-age. However, it saddens me, when I see that everywhere around everyone is so impressed with this digitalization that they feel there are only two answers to any question and you have to be on one of the sides. Everything under the sun is posed as a choice between just two options. Things are either black or white. There is no room for gray. There is either sunlight or moonlight. The beauty of the twilight is invisible.

Someone defines terrorism for you and you have to be either with him or with terrorists. If you doubt his definition, you are a deterrent in his anti-terrorism attacks and if you challenge the extremist ideology, you do not have the right to live in that society. The definer of terrorism will try his best to instigate the terrorism. He needs terrorism, otherwise who will support his definition. The immediate reaction to it is the surge of irrational radicalism. Now, if I want to be rational, the irrationals see me as an enemy and if I were to oppose the so-called anti-extremists, I become an extremist. I do not have any other option and neither the anti-terrorism camp nor the fundamentalist camp wants me to have any other option. I wonder if anyone envisaged that globalization would make even the self-centered diplomatic strategies more global.

You should either support or not support
the reservations. If you take a stand that you support the reservation as a policy but not its current manifestation or if you feel that there should be a continuous review of this policy and it should be introduced with a time-line for discontinuation, then you are being too diplomatic. Your stand is also politically incorrect. Since this policy favors those who need a favor, no one would support it. Only the policies, which benefit classes are implemented and masses have no other option. And if you thought your stand was justified, no please, you were not inline with this digital world. Who gave you the option to think on your own and come up with a third option?

The digitalization has not even spared the most eminent of the society. I recently read an article on some news channel website that quoted President Kalam. It referred to one of his speeches in which he advocated the need for rapidly evolving into a stable “two-party” system. Though I do not know the context in which he said this, with due respect to his stature, I was completely shocked to read that. It not only reinforces my opinion that the person from socio-political background should hold the political post but also displays this unreasonable craze for boiling down to just two options. I have had few chances to speak with people of democratic or socialist ideology in US. Democrats did not fall short of any words to criticize republicans. Socialist were in real precarious situation. They were all in joy to see republicans lose a state after state. I asked them a simple question – I know you are anti-republicans, but you are not pro-democrats. So whom do you vote for? They said – we sometimes support independent candidates, we support the people who support democratic candidate, but we generally abstain from voting. The most crucial right in a democracy that of voting is not used because the person does not have a third option. I am talking about a nation with more than two hundred years of democratic establishment and proud of its democratic institution. Just look around the nations with two-party systems. Just see how much representation the traditionally oppressed sectors, minorities or women have in the government. It is a separate issue to discuss pros and cons of parliamentary or presidential democracy but we must cherish the multi-party system for it represents the essence of diverse societies in the best possible way. Now this digitalized, globalized world delineates the picture that progress equals political stability (which is fine to an extent) equals two-party system (sorry please) and even the eminent in the society tend to accept this equation without questioning it.

This happens every now and then. US secretary of state publicly says that NAM has no relevance now. India has to deny this statement. I appreciate the immediate and strong denial but I wonder if there is anything more than that in NAM. No one seems to want non-alliance. The examples may be political. But, that is because that is the worst hit sector of digitalization and most dangerous outcome of digitalization. Just think and you will realize how we want to trivialize every other issue to two diametrically opposite viewpoints. We forget that a diameter has no meaning without a circle. It is just a line otherwise. And we need infinite points to define a circle.

I keep thinking about this digitalization. I wonder that some day I would hear Ms. Sagarika Ghose posing a question on Face the Nation: Is Digitalization irreversible? Yes or No. I would again stumble to find a digital answer to it and before I would think of any other alternative, the verdict would be out. I will simply keep comparing the high pitch of her voice to the pitch (and no way melody) of Kavita Krishnamoorthy and failing to find a convincing answer even to that, start reading a book on “Digital” Signal Processing.

Friday, July 6, 2007

सर्जन

वाळूत बांधलेल्या किल्ल्यास त्या अकाली
भिजवून चिंब गेली
वर्षा कुण्या सकाळी

सोसून तृप्त किल्ला आघात तो सरींचा
मृद्गंध क्रंदनाचा
हुंकार तो सुखाचा

शोषित सूर्यकिरणे आर्द्रास त्या दुपारी
पाडी तडे विखारी
त्या कोरड्या किनारी

सोसून तृप्त किल्ला आघात तो उन्हाचा
दुर्दम्य दृढ साचा
एकसंध वालुकेचा

रेषा कषाय श्रांत क्षितिजी कुणी चितारी
आकुंचल्या किनारी
लहरी उनाड भारी

वाळूस सुप्त होई नवस्पर्श बालकाचा
तो स्पर्श चेतनेचा
संकेत सर्जनाचा

Wednesday, June 20, 2007

उपजत

शिशिरागम झाला म्हणुनी
झाडांची पाने गळली
देही जी फुलली वस्त्रे
देहास त्यागुनी गेली

सृष्टीस या वसंताची
चाहूल लागली जेव्हा
चैतन्य भारल्या देही
पल्लवी विलसली तेव्हा

इथेच या खांद्यांवरती
पालवी खेळली होती
इथेच या फांद्यांवरती
रंगांची उधळण होती

पानांसह वृक्षाली ही
पावसात भिजली होती
पानांनी रंग बदलता
रंगात मिसळली होती

शिशिरास कशाने भुलली?
नि काय विचारे गळली?
उत्तर मागून झाडे
थंडीत गोठुनी गेली

मग पुन्हा पालवी फुटली
झाडांनी वस्त्रे ल्याली
आत्म्यात क्षमेची शक्ती
झाडांच्या कुठून आली?

Sunday, June 3, 2007

आता

कधी वाटतं गोंधळ कमी झाला आता
नंतर कळतं नवा संभ्रम सुरू होणार आता
कधी वाटतं रस्ता सरळ आहे आता
नंतर कळतं आयुष्य नवं वळण घेणार आता
कधी वाटतं जग सुंदर दिसतयं आता
नंतर कळतं नवं स्वप्न सुरू होणार आता
कधी वाटतं पुष्कळ माणसं जवळ आहेत आता
नंतर कळतं नव्याच कोषात गुरफटणार मी आता
कधी वाटतं किती शांत एकांत आहे आता
नंतर कळतं नवं वादळ येणार आहे आता
कधी वाटतं वादळं पेलायला सरावलोय मी आता
मनातलीच वादळं मन पेलू शकेल काय आता?

Saturday, June 2, 2007

इथे पावसाची गाज नाही

आज अचानक पाऊस पडला
तसा तो इथे नेहमीच पडतो
लखलखणा‍र्‍या सूर्यप्रकाशात अकस्मात ढग दाटून येतात
उभारी घेऊ पाहणार्‍या मनावर भयाचे सावट आणतात
पाऊस सुरु होतो
नि मी घरात बसतो
पावसाच्या सहस्रधारा कोसळत असतात
अन् मी मनातल्या मनात कोलमडत असतो

पाऊस फक्त पहायचा
अप्रत्यक्ष
भिजलेल्या झाडांवर
भिजलेल्या रस्त्यांवर
भिजलेल्या गाड्यांवर
कुणाच्या रेनकोटमधून टपटपताना
कुणाच्या छत्रीवरून ओघळताना
रस्त्यालगतच्या खड्ड्यांत साचलेला
खिडकीच्या काचांवर दाटलेला
गाडिच्या वायपरने पुसला जाणारा
सोडिअम वेपरच्या प्रकाशात उजळून जाणारा
तसाच तो अनुभवायचा
साध्या डोळ्यांना तो थेट दिसत नाही
मातीचा सुगंध येथे दरवळत नाही

मला वाटतं आज मनसोक्त भिजावं
थंडगार तुषार झेलून शहारून जावं
विसरून जाऊन जग सारं अवखळपणे बागडावं
तन भिजेपर्यंत मन रिझेपर्यंत
नंतर वाटतं भजी खावी
गरमागरम चहा पीत अंगावर रजई घ्यावी
पण ह्यातलं काहीच होत नाही
मी फक्त पाऊस पाहत बसतो
अप्रत्यक्ष

उद्या सकाळी निघताना कदाचित लख्खं ऊन असेल
काळ्याभोर मेघांची दूरवरही चाहूल नसेल
मनातले मेघ मात्र अजून तसेच दाटले असतील
मला व्यापणारी काळी छत्री माझ्या बॅगेत नक्की असेल
आणि जर पाऊस पडणारच असेल
तर तसं इथलं हवामानखातं मला सांगेल
प्रत्यक्ष डोळ्यांना न दिसणारा पाऊस ह्यांना बरा हमखास दिसतो
मी मात्र डोकावून डोकावून त्याचं अस्तित्त्व शोधत असतो

पावसाचं असं हे न सांगता येणं मला मुळीच आवडत नाही
आणि आल्यावर असं गप्प बसणं मला सहन होत नाही
इथला पाऊस सादच घालत नाही
कारण,
इथे पावसाची गाज नाही!‍‍‍

Welcome

Welcome to this journey into realms of my own senses, replicated for you to get a glimpse of those through your senses!

:)

a Sane man