साप अजून सुसंस्कृत आहेत.
कुठल्याशा इसमानं लोळवलं एकाला
म्हणून अखिल सर्पजातीच्या अस्तित्त्वाचे प्रश्न
त्यांना अद्याप पडलेले नाहीत.
नि तमाम सर्पजातीच्या रक्षणाचा मक्ता कुणीही न सांगता घेऊन
खलनिग्रहणाय पेटून उठण्यासाठी उद्युक्त करणारं
सूडदार विष अद्याप भिनलं नाही त्यांच्यात.
त्यामुळेच असावं
सर्व नाग, घोणस, फुरसे, मण्यार अजगरासारखे पडून आहेत.
कुठल्याशा कल्पनेतील भयाने बिथरून
सर्वत्र फुत्कार करीत फिरण्याची
आपल्या हालाहलाने चराचर जाळून टाकण्याची
प्रसंगी एखाद्यावर दंशप्रहार करण्याची
व हे सर्व करताना आपल्या अंगात भिनलेलं विष
दुसर्यांच्याही रोमारोमांत पेरत जाण्याची
त्यांना अद्याप गरज वाटत नाही.
नाही म्हणायला काही नाग आहेत
जे सांगत फिरताहेत सगळ्यांना की
उठा, बिळातून बाहेर या, आपल्या विळख्यात जखडून टाका
ह्या जगातले सगळे व्यवहार.
आताशा असेही सांगतात ते
की आम्हीच शेतीचे तारणहार,
"उंदिर, घुशींना मारणार कोण?
आमच्याशिवाय आहेच कोण?"
बाकी सगळे बाहेरचे
आम्ही इथल्या मातीचे
आम्हांला माराल तर याद राखा
विषाचा आमच्या मान राखा.
पण म्हणून बिळाबिळांतून बाहेर येण्याची
सर्पसृष्टीला अद्याप गरज वाटली नाही.
उद्या आपण रस्त्यावर आलो
तर हेच नागोबा
आपल्या आयत्या बिळात
करतील घरोबा
हे समजण्याएवढी बुद्धी त्यांनी अद्याप शाबूत ठेवली आहे
साप अजून सुसंस्कृत आहेत.
त्यांचं सुसंस्कृतपण फक्त तेवढ्यापुरतंच नाही.
ते बिळात वेटोळे करून बसल्यावरसुद्धा
भूमिगत राहून
हळू आवाजात त्या विखारी नागांबद्दल
सहानुभूती दाखवत नाहीत.
ते त्यांना जराही भीक घालत नाहीत.
ते दिवसा स्वस्थ बसून राहतात.
नि रातोरात उंदिरादी भक्ष्य गिळून
आपलं पोट भरतात
शेताचं रक्षण करतात
नि कर्मण्येवाधिकारस्तेच्या चालीने
उंदीर रवंथ करत
आपापल्या बिळांत सुखी राहतात.
कधी नाहीच मिळाला एखादा उंदीर
तरीही ते
पोटातली आग विष ओकून
वाढवत नाहीत
व ओकून वाया गेलेले विष
जहरी विचारांनी पुन्हा मिळवत नाहीत
ह्याचे श्रेय
त्यांच्या निसर्गतःच नसलेल्या कानांना नसून
निसर्गतःच असणार्या अंगभूत लवचिकपणाला आहे
म्हणूनच
साप अजून सुसंस्कृत आहेत.
एरवी समस्त मानवजातीला
नकुलांच्या समान तोलून
त्यांच्याविरुद्ध गरळ ओकणारे
नि पंचमीला स्वतःला ओवाळून घेणारे
हे स्वयंभू नाग
आणि ते आपल्यासारखंच वागून आपल्यापेक्षा सरस ठरू पाहतात
म्हणून त्यांचा मत्सर करणारे
व स्वतःचं गोत्र थेट शिवाच्या नागाशी सांगणारे
काही शिवराळ बोलीचे नाग
जर वगळले
तर समग्र सर्पसृष्टी
आपली विविधतेमधील एकता जपून आहे.
केवळ फणा काढता येतो
म्हणून नागांचे नेतृत्व
सर्पजातीला मान्य नाही.
फण्याच्या धाकाला न डरण्याइतका
निर्भीड बाणा ते अद्याप राखून आहेत.
त्यांचं नशीबही असं थोर की
सर्पराज्याची सत्ता अजगरांच्या हातात नाही.
सामान्य सर्प चार शेतं फिरलेल्या सापांचं नेतृत्व मान्य करतात.
स्वसंरक्षणासाठी लाभलेल्या उपजत शक्तींवर त्यांचा विश्वास आहे.
त्यांना विषाचं उसनं अवसान आणावं लागत नाही.
एखादा मण्यार शेतात आला म्हणून
घोणस त्याला हुसकावून लावत नाही.
आपल्या विषाचा मान ते स्वतःच राखून असतात
नि आपल्या दंशाचे परिणाम
आपल्या बांधवांना भोगावे लागू नयेत म्हणून ते सतर्क असतात.
जर कळलीच एखादी दुर्दैवी घटना,
आपल्या बांधवाच्या खुनाची
तर दिसणार्या प्रत्येक माणसात
त्या अपराध्याचा चेहरा पाहून
पृथ्वी निर्मनुष्य करण्याची
आततायी परशुरामी प्रतिज्ञाही ते करत नाहीत.
क्षात्र उचलून पृथ्वी निःक्षत्रिय करण्यातला फोलपणा कळलाय त्यांना.
ऐकतात कानावर येतं ते
नि असतात काही माणसं
सापाच्या जातीची
असं म्हणून अंतःकरणातील बंधुभावाला स्मरून
त्यांना मोठ्या मनाने माफ करतात.
फार कमी उरलेत विषारी त्यांच्यात.
त्यांच्या विषाची लस
विष उतरवते,
भिनवत नाही.
त्यांचा एकूणच प्रवास विष उतरविण्याकडे आहे,
कदाचित म्हणूनच,
साप अजून सुसंस्कृत आहेत!
Wednesday, October 29, 2008
Tuesday, October 21, 2008
रेषेवरची अक्षरे
एक नवा उपक्रम...
रेषेवरची अक्षरे २००८
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आपण आपली प्रतिक्रिया रेषेवरची अक्षरे २००८ ह्या ब्लॉगवर नोंदवू शकता.
शुभ दीपावली!
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आपण आपली प्रतिक्रिया रेषेवरची अक्षरे २००८ ह्या ब्लॉगवर नोंदवू शकता.
शुभ दीपावली!
Thursday, October 16, 2008
पाऊस, पर्जन्य, आणि वृष्टी
विशेष सूचना: "ब्लॉगविश्वातील अनेक ब्लॉग, ब्लॉगर, त्यांची शैली, लेख ह्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष उल्लेख, संदर्भ ह्या लेखात आहे. थोडी थट्टामस्करीही. केवळ गमतीने व विनोदनिर्मितीसाठी. कोणत्याही ब्लॉगरवर व्यक्तिशः कुठलीही टिका करण्याचा हेतू नाही; तसेच कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. आपणही हे सर्व गमतीनेच घ्याल अशी आशा करतो व तरीही कोणी दुखावले गेल्यास त्यांची आधीच क्षमा मागतो."
इतरेतर द्वंद्व समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व हे तिघे बंधू| (प्रेरणाः कुमारभारती इ. १०वी, गद्य विभाग, प्रकरण १ नरींद्रबासां भेटि अनुसरण. नववी किंवा दहावीतील काहीतरी उद्धृत केल्याशिवाय काही (अति)शहाण्या इसमांना विनोदी लेख पुढे लिहिताच येत नाही. नाइलाज!) इतरेतरांमधील द्वंद्व "आणि" ह्या अव्ययाने सोडवतात. समाहारांमधील द्वंद्वात "इतर वगैरें"ना ओढून वड्याचं तेल वांग्यावर काढतात. वैकल्पिक द्वंद्व मात्र दोहोंपैकी एकच विकल्प लॉक करावा लागेल असे म्हणून, हे "किंवा" ते, असे विकल्पाने सोडवतात. तर आयुष्यातील वैकल्पिक अनुभवदर्शक समाहारसदृश असंबद्ध गोष्टी इतरेतरसूचक अव्ययाने जोडून त्यावर ब्लॉग लिहिणे अशी हल्लीची फ्याशन आहे. पण आपण काळाबरोबर राहूनही काही तर्कशुद्ध केले पाहिजे, म्हणून आम्ही तीन समान गोष्टी, पाऊस, पर्जन्य, आणि वृष्टी, "आणि" ने बांधल्या आहेत. फ्याशनची फ्याशन वर आम्ही rational ते rational. शिवाय आणिच्या आधी स्वल्पविराम टाकून विंग्रजीत रिपोर्ट लिहून शिकलेल्या गोष्टीची मराठी व्याकरणात भर टाकल्याचं इंटरडिसिप्लिनरी श्रेय.
हा चक्क चक्क प्रताधिकाराचा भंग आहे, असं सांगणारा संवादिनीचा आर्त षड्ज आम्हांस ऐकू येत आहे. तो खालचा की वरचा हे आम्हांस ते दोन्ही सूर एकामागोमाग एक वाजवून दाखविल्याशिवाय कळत नाही. पण तारसप्तकातलाच असावा, भावनोत्कट. पण आम्हांस त्याची फिकीर नाही. इथे कुणीच कायदेशीर प्रताधिकार बाळगून नाही, हे आम्ही जाणून आहोत. प्रताधिकारावरील सर्व सपट व सपाट महाचर्चा आम्ही वाचून आहोत. त्यामुळे कोणाला जे म्हणायचे ते म्हणो. शिवाय आम्हांस अनाम वीरांचीही भीती नाही. आम्ही कमेंट मॉडरेशन बंद करूनसुद्धा अनामवीरांना इथे लढावंसं वाटत नाही. त्यामुळे आमचा ब्लॉग एवढा फेमस नसल्याचे हे फायदे आम्ही खूब जाणून आहोत. प्रतिक्रिया ह्या हे संवादाचे माध्यम असल्याच्या निदर्शक आहेत. त्यामुळे त्यांचं स्वागतच आहे. आता संवादाचा च्यानल म्हटला की त्याच्याबरोबर additive white gaussian noise सुद्धा येणार हे आम्ही जाणून आहोत. तो काढून टाकण्यासाठी फिल्टर लागतात हे आम्ही थिअरॉटिकली सांगू शकतो. पण आम्ही त्याहून खालच्या सर्किट पातळीवर जात नाही. तो आमचा प्रांत नव्हे. आम्ही इलेक्ट्रॉनिक सर्किटविषयी व लो लेवल सर्किट डिझाइन विषयी बोलत आहोत. उगीच गैरसमज नसावा. पण सर्किट म्हटलं की इथून तिथून सारखंच. आम्हांला हवं तेव्हा बंद पडणारं. (अतिरेक्यांची चालत नाहीत, तर आमचं काय! वाचकांत कुणी अतिरेकी विंजिनिअर असतील तर त्यांच्यासाठी - ही ५५५ टायमर वाली सर्किटं अगदीच बिनभरवशाची असतात, नाही का हो?) काही ब्लॉग जसे अंगात येऊन भूमिगत होतात तशी. मग आम्ही काय चतुराई केलीय की आम्ही ब्लॉग सापडला की त्याला गूगलच्या रीडरमध्ये टाकतो. मग लोकांनी एकदा का काही प्रसिद्ध केलं की आमच्याकडे ते गूगलची मेहेरबानी आहे तोवर राहतं, त्यांनी मग त्याचं काय पण करो. आपलं सर्किट चाललं नाही, तर आधीच्या गटाची निरीक्षणं घेऊन फर्मास निष्कर्ष काढून प्रयोग सिद्धिस नेण्याचा विंजिनिअरींगचा चार वर्षांचा दांडगा अनुभव आहे आमच्याकडे. "अनु"भव काय फक्त जावा प्रोग्रामरकडेच असतात? आता अशाच काही प्रोग्रामरच्या अनुभवांची पारायणं करतो आम्हीही आमचा प्रोग्राम काहीबाही एक्सेप्शन फेकू लागला की. समदु:ख दुसरं काय! वास्तविक आमच्या कोडमध्ये जराही चूक नाही, हा उगीच फेकतोय धावताना चूक चूक म्हणून, अशी आमची ठाम समजूत असते. पण तोही हट्टाला पेटलेला असतो. मग तशा दिग्मूढ अवस्थेत आम्हांला ब्लॉग सुचतात, चारचौघांना सुचतात ना अगदी तस्सेच.
"कसं ना असतं आयुष्य आपलं...<आयुष्य? नक्की?>...
आपण मन लावून काम करतो, एखाद्या कोडसाठी आपलं सर्वस्व पणाला लावतो, पण शेवटी तो आपल्या मनासारखा चालतोच असं नाही...खूप दुःख होतं मग...<हुंदका अधिक अश्रू>.
नि मग आपल्याला काहीच सुचत नाही...की माझ्याबरोबरच असं का व्हावं? आपण तर इतकी जिवापाड मेहनत केलेली त्यासाठी...खूपच हताश...सगळं कसं अंधारून आल्यासारखं...<हमसून हमसून रडणं>...
मग आपण खूप खूप शोधतो, गूगलवर वगैरे, काय करायचं पुढे ह्याबद्दल...<आयुष्यात? की कोडमध्ये?>
मग काही मदतीचे हात नि काही भरवशाचे हात सोडून गेलेले आपल्याला...<ढसाढसा रडणं जमायला हवं इथवर>...
मग आपण स्वतःच मार्ग काढतो, कोड चालतो, नि कळतं आपल्याला की धिस इज लाईफ यू नो! <आनंदाश्रू, कित्ती गं माझी गुणाची बाय ती>
...पण तेही फार काळ राहत नाही...तो प्रोजेक्ट संपतो, आपण दुसरं काहीतरी करायच्या मागे. एवढं सगळं आपण केलेलं मागे सोडून जायचं?...ते हापिस, तो आपला पीसी...ते आपले बरे वाईट सहकारी...त्याचं ते "इथे चुकीचा अरे इंडेक्स वापरतेयंस तू" असं झटकन सांगणं आणि...तो --- आपला कोड <धाय मोकलून रडणं>
...*******//<पुढची अक्षरे फक्त डोळ्यांवर आसवांचा थर असेल तरच दिसतील>"
मग असंच काहीसं आम्हीही ब्लॉगतो. अगदी मनमोकळं. मग त्यावर खूप खूप प्रतिक्रिया येतात. त्यात लोक खूप खूप छान छान लिहितात. फार फार लोकांनी मानसशास्त्राचा सखोल अभ्यास केलाय असं आम्हांला लगेच कळतं. मग त्या सगळ्यांचा कित्ती कित्ती आधार वाटतो. पण तरीही काही खोचक लोक त्यात उगीच साहित्य शोधतात नि खूप खवचट प्रतिक्रिया देतात. आता नाही आमची शैली मेघनाताईंसारखी कमावलेली. म्हणजे मेघना पेठे बरं का! नाही आमचं लिखाण संधिप्रकाशात हसणार्या ट्युलिपच्या फुलांसारखं सुंदर. पण म्हणून काय आम्ही आमचं मन चारचौघांत मोकळं करूच नये? गूगल फुकटात जागा देतंय, लोक फुकटात देवनागरी फाँट देताहेत, तर ह्या लोकांचं काय जळतंय? जग फार फार वाईट आहे, नाही? हेही खरं तर त्याच ब्लॉगमध्ये पुढे लिहिणार होतो आम्ही. भाग बिग पाडून नव्हे..तिथ्थेच. पण नाही केलं तसं. एक वेगळं पोस्टच टाकलं, ह्याच्याखाली क्रमशः असं नुसतं टाकून. कारण असं की, एक तर मुळात अशा तिथ्थेच पुढे लिहिण्याच्या अभिजात कल्पना आम्हांला शिवतसुद्धा नाहीत. नि शिवाय तिथ्थेच पुढे लिहिलं तर गुगल रीडर वर अपडेट येत नाही हो. मग लोकांना कळणार कसं आम्ही ब्लॉगलोय ते? नि मग ते वाचणार कोण? शिवाय आपल्याच ब्लॉगवर आपणच प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया लिहून मूळ पोस्टपेक्षा मोठ्ठं नि चांगलं लिहावं अशीही काही आमची प्रतिभा नाही. त्याला आता आम्ही काय करणार?
मग आम्हांला कळतच नाही की आपण प्रतिभा "आणि" प्रतिमेच्या जगात आहोत की ब्लॉगच्या? लिहिताना ज्यात त्यात कसल्या प्रतिमा? आपल्या पुरवून संपल्या की मग इतरांच्या. हिंदी गाणी बिणि लिहितात हो मध्ये मध्ये. कसे अर्थ लागतात? आमचं अगाध हिंदी म्हणजे...
"तुम कायकू लिखता?"
"कायकू? हम हायकू लिख रहे हैं"
"हायकू? कायकू?"
"ऐसैच"...
असंच?...असंच आपलं सहज सुचलं म्हणून हे लोक काहीही लिहितात हो! मागे मीही एक कविता लिहिलेली, अर्थात मराठीत.
"हे अर्घ्य तुला रे प्रभू
मी संध्याकाळी देतो
तूच मला शिकविली
स्तोत्रे मी सावध गातो
अर्पितो मी तुज प्रेमाने
ही जास्वंदाची फुले
गणपतीस वाहून झाली
हे तुझ्याचसाठी उरले
बहरली नगरी जैशी
उज्जैनी क्षिप्रेकाठी
आरती तुजला गाते
सप्रेम निरोपासाठी"
ह्यावर वाचून गप्प बसावं ना? तर ते नाही. कवितेवर कविता करतात...
"कवितेत कविता ग्रेसांची, आरती माझ्या श्वासांची." अजून मला हा संदिग्ध अर्थाचा उखाणा उलगडला नाहीये. वास्तविक ही आरती म्हणजे आरती प्रभू का? नि त्यांची कविता तुमच्या श्वासाश्वासांत भरलीये की कविता हाच तुमचा श्वास आहे व ती तुम्हाला दैवतासमान आहे? की तुमच्या हिचं नाव आरती आहे? असे काही प्रश्न विचारावेसे वाटत होते आम्हाला. पण नाही लिहिली प्रतिप्रतिक्रिया. उगाच सगळे जण धावून आले असते नि आम्हाला चक्रव्यूहात पकडलं असतं, खाजगी प्रश्न कशाला म्हणून. मग मला फडणवीस नानांना विचारावं लागलं असतं, की चक्रव्यूह कसा फोडतात?
एका स्वतःला (अति)शहाण्या म्हणवून घेणार्या इसमाने काय लिहावं? "जरा वृत्तात मार खाल्लाय"...अरे (न)शहाण्या माणसा, जाळ ती वृत्तं. वृत्ताबित्तात कसल्या लिहितोस कविता? सोडा ते चाकोरीबद्ध विचार...छे! त्यावर त्याची प्रतिप्रतिप्रतिक्रिया काय असावी? "असेन मी नसेन मी, तरी असेल वृत्त हे". अरे आवरा ह्याला...एका गझलेचं काय भाषांतर केलं, तर हा असेन नसेन स्वतःला शांता शेळके अधिक सुरेश भट समजू लागलाय का? हद्द आहे. दोन साहित्यिकांचे असे दाखले देऊन टिका करताच आम्हांला आम्ही साहित्यिक होण्याच्या वाटेवर आहोत असे वाटू लागले. पण पुढच्याच प्रतिक्रियेने आम्हाला जमिनीवर आणलं.
"ही न-साहित्यिक प्रार्थना म्हणायची का? तुम्ही एक नवा पायंडा पाडता आहात. कारण ब्लॉग साहित्यिकांची प्रार्थना तर आधीच ठरली आहे...'अनुदिनि अनुतापे तापलो रामराया'...". म्हणजे थोडक्यात आम्ही कविता लिहूनही साहित्यिक नाही. एक तर अनुदिनी हा शब्द आम्हांला अनुदिन बोचतो. आम्हांला हे काव्य पूर्ण माहित नाही, पण ह्याच्या पुढची ओळ, 'कठिण समय येता कोण कामास येतो' अशी असल्याची आमची ठाम समजूत आहे. नाहीये का तसं? म्हणून वृत्ताबित्तांच्या फंदात पडत नाही आम्ही. आम्हांला 'न न म य य गणांनी मालिनी वृत्त होते' ह्या चालीवरचं सगळं सारखंच वाटतं.
मग म्हटलं असो. आपण आपलं स्टँडर्ड ब्लॉगवालं पोस्ट लिहू. पाऊस व घरव्याकुळता (ही पण बहुतेक ह्या ब्लॉगवाल्यांचीच भर शब्दसंपदेत). मग म्हटलं त्यात आपलं काहीतरी वेगळेपण हवं. मग पावसाला कशी लोकांनी वेगवेगळी नावं ठेवली आहेत (!), नि कसा त्या प्रत्येकांत आपला नॉस्ट्याल्जिया आषाढाच्या आभाळासारखा भरलाय...झरतो तर रितं रितं वाटतं नि नाहीच तर अडकल्यासारखं...ह्यावर लिहावं. पोस्ट लिहून झालं नि नावावर घोडं अडलं...पाऊस, व्याकुळ, पर्यावरण, सृष्टी, ग्लोबल प्रेसिपिटेशन - लोकल मेमरीज...छ्या!....मग आम्हीही फ्याशनेबल व्हायचं ठरवलं नि एक फक्कड नाव देऊन मोकळे झालो. पाऊस, पर्जन्य, आणि वृष्टी. कसंकाय वाटतंय?
इतरेतर द्वंद्व समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व हे तिघे बंधू| (प्रेरणाः कुमारभारती इ. १०वी, गद्य विभाग, प्रकरण १ नरींद्रबासां भेटि अनुसरण. नववी किंवा दहावीतील काहीतरी उद्धृत केल्याशिवाय काही (अति)शहाण्या इसमांना विनोदी लेख पुढे लिहिताच येत नाही. नाइलाज!) इतरेतरांमधील द्वंद्व "आणि" ह्या अव्ययाने सोडवतात. समाहारांमधील द्वंद्वात "इतर वगैरें"ना ओढून वड्याचं तेल वांग्यावर काढतात. वैकल्पिक द्वंद्व मात्र दोहोंपैकी एकच विकल्प लॉक करावा लागेल असे म्हणून, हे "किंवा" ते, असे विकल्पाने सोडवतात. तर आयुष्यातील वैकल्पिक अनुभवदर्शक समाहारसदृश असंबद्ध गोष्टी इतरेतरसूचक अव्ययाने जोडून त्यावर ब्लॉग लिहिणे अशी हल्लीची फ्याशन आहे. पण आपण काळाबरोबर राहूनही काही तर्कशुद्ध केले पाहिजे, म्हणून आम्ही तीन समान गोष्टी, पाऊस, पर्जन्य, आणि वृष्टी, "आणि" ने बांधल्या आहेत. फ्याशनची फ्याशन वर आम्ही rational ते rational. शिवाय आणिच्या आधी स्वल्पविराम टाकून विंग्रजीत रिपोर्ट लिहून शिकलेल्या गोष्टीची मराठी व्याकरणात भर टाकल्याचं इंटरडिसिप्लिनरी श्रेय.
हा चक्क चक्क प्रताधिकाराचा भंग आहे, असं सांगणारा संवादिनीचा आर्त षड्ज आम्हांस ऐकू येत आहे. तो खालचा की वरचा हे आम्हांस ते दोन्ही सूर एकामागोमाग एक वाजवून दाखविल्याशिवाय कळत नाही. पण तारसप्तकातलाच असावा, भावनोत्कट. पण आम्हांस त्याची फिकीर नाही. इथे कुणीच कायदेशीर प्रताधिकार बाळगून नाही, हे आम्ही जाणून आहोत. प्रताधिकारावरील सर्व सपट व सपाट महाचर्चा आम्ही वाचून आहोत. त्यामुळे कोणाला जे म्हणायचे ते म्हणो. शिवाय आम्हांस अनाम वीरांचीही भीती नाही. आम्ही कमेंट मॉडरेशन बंद करूनसुद्धा अनामवीरांना इथे लढावंसं वाटत नाही. त्यामुळे आमचा ब्लॉग एवढा फेमस नसल्याचे हे फायदे आम्ही खूब जाणून आहोत. प्रतिक्रिया ह्या हे संवादाचे माध्यम असल्याच्या निदर्शक आहेत. त्यामुळे त्यांचं स्वागतच आहे. आता संवादाचा च्यानल म्हटला की त्याच्याबरोबर additive white gaussian noise सुद्धा येणार हे आम्ही जाणून आहोत. तो काढून टाकण्यासाठी फिल्टर लागतात हे आम्ही थिअरॉटिकली सांगू शकतो. पण आम्ही त्याहून खालच्या सर्किट पातळीवर जात नाही. तो आमचा प्रांत नव्हे. आम्ही इलेक्ट्रॉनिक सर्किटविषयी व लो लेवल सर्किट डिझाइन विषयी बोलत आहोत. उगीच गैरसमज नसावा. पण सर्किट म्हटलं की इथून तिथून सारखंच. आम्हांला हवं तेव्हा बंद पडणारं. (अतिरेक्यांची चालत नाहीत, तर आमचं काय! वाचकांत कुणी अतिरेकी विंजिनिअर असतील तर त्यांच्यासाठी - ही ५५५ टायमर वाली सर्किटं अगदीच बिनभरवशाची असतात, नाही का हो?) काही ब्लॉग जसे अंगात येऊन भूमिगत होतात तशी. मग आम्ही काय चतुराई केलीय की आम्ही ब्लॉग सापडला की त्याला गूगलच्या रीडरमध्ये टाकतो. मग लोकांनी एकदा का काही प्रसिद्ध केलं की आमच्याकडे ते गूगलची मेहेरबानी आहे तोवर राहतं, त्यांनी मग त्याचं काय पण करो. आपलं सर्किट चाललं नाही, तर आधीच्या गटाची निरीक्षणं घेऊन फर्मास निष्कर्ष काढून प्रयोग सिद्धिस नेण्याचा विंजिनिअरींगचा चार वर्षांचा दांडगा अनुभव आहे आमच्याकडे. "अनु"भव काय फक्त जावा प्रोग्रामरकडेच असतात? आता अशाच काही प्रोग्रामरच्या अनुभवांची पारायणं करतो आम्हीही आमचा प्रोग्राम काहीबाही एक्सेप्शन फेकू लागला की. समदु:ख दुसरं काय! वास्तविक आमच्या कोडमध्ये जराही चूक नाही, हा उगीच फेकतोय धावताना चूक चूक म्हणून, अशी आमची ठाम समजूत असते. पण तोही हट्टाला पेटलेला असतो. मग तशा दिग्मूढ अवस्थेत आम्हांला ब्लॉग सुचतात, चारचौघांना सुचतात ना अगदी तस्सेच.
"कसं ना असतं आयुष्य आपलं...<आयुष्य? नक्की?>...
आपण मन लावून काम करतो, एखाद्या कोडसाठी आपलं सर्वस्व पणाला लावतो, पण शेवटी तो आपल्या मनासारखा चालतोच असं नाही...खूप दुःख होतं मग...<हुंदका अधिक अश्रू>.
नि मग आपल्याला काहीच सुचत नाही...की माझ्याबरोबरच असं का व्हावं? आपण तर इतकी जिवापाड मेहनत केलेली त्यासाठी...खूपच हताश...सगळं कसं अंधारून आल्यासारखं...<हमसून हमसून रडणं>...
मग आपण खूप खूप शोधतो, गूगलवर वगैरे, काय करायचं पुढे ह्याबद्दल...<आयुष्यात? की कोडमध्ये?>
मग काही मदतीचे हात नि काही भरवशाचे हात सोडून गेलेले आपल्याला...<ढसाढसा रडणं जमायला हवं इथवर>...
मग आपण स्वतःच मार्ग काढतो, कोड चालतो, नि कळतं आपल्याला की धिस इज लाईफ यू नो! <आनंदाश्रू, कित्ती गं माझी गुणाची बाय ती>
...पण तेही फार काळ राहत नाही...तो प्रोजेक्ट संपतो, आपण दुसरं काहीतरी करायच्या मागे. एवढं सगळं आपण केलेलं मागे सोडून जायचं?...ते हापिस, तो आपला पीसी...ते आपले बरे वाईट सहकारी...त्याचं ते "इथे चुकीचा अरे इंडेक्स वापरतेयंस तू" असं झटकन सांगणं आणि...तो --- आपला कोड <धाय मोकलून रडणं>
...*******//<पुढची अक्षरे फक्त डोळ्यांवर आसवांचा थर असेल तरच दिसतील>"
मग असंच काहीसं आम्हीही ब्लॉगतो. अगदी मनमोकळं. मग त्यावर खूप खूप प्रतिक्रिया येतात. त्यात लोक खूप खूप छान छान लिहितात. फार फार लोकांनी मानसशास्त्राचा सखोल अभ्यास केलाय असं आम्हांला लगेच कळतं. मग त्या सगळ्यांचा कित्ती कित्ती आधार वाटतो. पण तरीही काही खोचक लोक त्यात उगीच साहित्य शोधतात नि खूप खवचट प्रतिक्रिया देतात. आता नाही आमची शैली मेघनाताईंसारखी कमावलेली. म्हणजे मेघना पेठे बरं का! नाही आमचं लिखाण संधिप्रकाशात हसणार्या ट्युलिपच्या फुलांसारखं सुंदर. पण म्हणून काय आम्ही आमचं मन चारचौघांत मोकळं करूच नये? गूगल फुकटात जागा देतंय, लोक फुकटात देवनागरी फाँट देताहेत, तर ह्या लोकांचं काय जळतंय? जग फार फार वाईट आहे, नाही? हेही खरं तर त्याच ब्लॉगमध्ये पुढे लिहिणार होतो आम्ही. भाग बिग पाडून नव्हे..तिथ्थेच. पण नाही केलं तसं. एक वेगळं पोस्टच टाकलं, ह्याच्याखाली क्रमशः असं नुसतं टाकून. कारण असं की, एक तर मुळात अशा तिथ्थेच पुढे लिहिण्याच्या अभिजात कल्पना आम्हांला शिवतसुद्धा नाहीत. नि शिवाय तिथ्थेच पुढे लिहिलं तर गुगल रीडर वर अपडेट येत नाही हो. मग लोकांना कळणार कसं आम्ही ब्लॉगलोय ते? नि मग ते वाचणार कोण? शिवाय आपल्याच ब्लॉगवर आपणच प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया लिहून मूळ पोस्टपेक्षा मोठ्ठं नि चांगलं लिहावं अशीही काही आमची प्रतिभा नाही. त्याला आता आम्ही काय करणार?
मग आम्हांला कळतच नाही की आपण प्रतिभा "आणि" प्रतिमेच्या जगात आहोत की ब्लॉगच्या? लिहिताना ज्यात त्यात कसल्या प्रतिमा? आपल्या पुरवून संपल्या की मग इतरांच्या. हिंदी गाणी बिणि लिहितात हो मध्ये मध्ये. कसे अर्थ लागतात? आमचं अगाध हिंदी म्हणजे...
"तुम कायकू लिखता?"
"कायकू? हम हायकू लिख रहे हैं"
"हायकू? कायकू?"
"ऐसैच"...
असंच?...असंच आपलं सहज सुचलं म्हणून हे लोक काहीही लिहितात हो! मागे मीही एक कविता लिहिलेली, अर्थात मराठीत.
"हे अर्घ्य तुला रे प्रभू
मी संध्याकाळी देतो
तूच मला शिकविली
स्तोत्रे मी सावध गातो
अर्पितो मी तुज प्रेमाने
ही जास्वंदाची फुले
गणपतीस वाहून झाली
हे तुझ्याचसाठी उरले
बहरली नगरी जैशी
उज्जैनी क्षिप्रेकाठी
आरती तुजला गाते
सप्रेम निरोपासाठी"
ह्यावर वाचून गप्प बसावं ना? तर ते नाही. कवितेवर कविता करतात...
"कवितेत कविता ग्रेसांची, आरती माझ्या श्वासांची." अजून मला हा संदिग्ध अर्थाचा उखाणा उलगडला नाहीये. वास्तविक ही आरती म्हणजे आरती प्रभू का? नि त्यांची कविता तुमच्या श्वासाश्वासांत भरलीये की कविता हाच तुमचा श्वास आहे व ती तुम्हाला दैवतासमान आहे? की तुमच्या हिचं नाव आरती आहे? असे काही प्रश्न विचारावेसे वाटत होते आम्हाला. पण नाही लिहिली प्रतिप्रतिक्रिया. उगाच सगळे जण धावून आले असते नि आम्हाला चक्रव्यूहात पकडलं असतं, खाजगी प्रश्न कशाला म्हणून. मग मला फडणवीस नानांना विचारावं लागलं असतं, की चक्रव्यूह कसा फोडतात?
एका स्वतःला (अति)शहाण्या म्हणवून घेणार्या इसमाने काय लिहावं? "जरा वृत्तात मार खाल्लाय"...अरे (न)शहाण्या माणसा, जाळ ती वृत्तं. वृत्ताबित्तात कसल्या लिहितोस कविता? सोडा ते चाकोरीबद्ध विचार...छे! त्यावर त्याची प्रतिप्रतिप्रतिक्रिया काय असावी? "असेन मी नसेन मी, तरी असेल वृत्त हे". अरे आवरा ह्याला...एका गझलेचं काय भाषांतर केलं, तर हा असेन नसेन स्वतःला शांता शेळके अधिक सुरेश भट समजू लागलाय का? हद्द आहे. दोन साहित्यिकांचे असे दाखले देऊन टिका करताच आम्हांला आम्ही साहित्यिक होण्याच्या वाटेवर आहोत असे वाटू लागले. पण पुढच्याच प्रतिक्रियेने आम्हाला जमिनीवर आणलं.
"ही न-साहित्यिक प्रार्थना म्हणायची का? तुम्ही एक नवा पायंडा पाडता आहात. कारण ब्लॉग साहित्यिकांची प्रार्थना तर आधीच ठरली आहे...'अनुदिनि अनुतापे तापलो रामराया'...". म्हणजे थोडक्यात आम्ही कविता लिहूनही साहित्यिक नाही. एक तर अनुदिनी हा शब्द आम्हांला अनुदिन बोचतो. आम्हांला हे काव्य पूर्ण माहित नाही, पण ह्याच्या पुढची ओळ, 'कठिण समय येता कोण कामास येतो' अशी असल्याची आमची ठाम समजूत आहे. नाहीये का तसं? म्हणून वृत्ताबित्तांच्या फंदात पडत नाही आम्ही. आम्हांला 'न न म य य गणांनी मालिनी वृत्त होते' ह्या चालीवरचं सगळं सारखंच वाटतं.
मग म्हटलं असो. आपण आपलं स्टँडर्ड ब्लॉगवालं पोस्ट लिहू. पाऊस व घरव्याकुळता (ही पण बहुतेक ह्या ब्लॉगवाल्यांचीच भर शब्दसंपदेत). मग म्हटलं त्यात आपलं काहीतरी वेगळेपण हवं. मग पावसाला कशी लोकांनी वेगवेगळी नावं ठेवली आहेत (!), नि कसा त्या प्रत्येकांत आपला नॉस्ट्याल्जिया आषाढाच्या आभाळासारखा भरलाय...झरतो तर रितं रितं वाटतं नि नाहीच तर अडकल्यासारखं...ह्यावर लिहावं. पोस्ट लिहून झालं नि नावावर घोडं अडलं...पाऊस, व्याकुळ, पर्यावरण, सृष्टी, ग्लोबल प्रेसिपिटेशन - लोकल मेमरीज...छ्या!....मग आम्हीही फ्याशनेबल व्हायचं ठरवलं नि एक फक्कड नाव देऊन मोकळे झालो. पाऊस, पर्जन्य, आणि वृष्टी. कसंकाय वाटतंय?
Friday, September 26, 2008
जाता जाता...
...
एक्झिट २८.
शेवटी एकदाची गाडी हो नाही हो नाही करत वाहनांच्या गर्दीत.
निळ्या फोर्डचे आभार आत येऊ दिल्याबद्दल. संध्याकाळच्या पाच वाजता घर सोडलं तेव्हाच वाटलं होतं की, ट्र॓फिक आज जीव खाणार. पण इलाज नाही.
किती वेळ लागेल पोहोचायला आज?
सगळं सुरळित असताना साडेचार तास लागतात. आज पाच?
आत शिरल्यापासून ब्रेकवरचा पाय जसाच्या तसा...
मग थोडा हिय्या करून नि शेजारच्या लेनमधल्या एकदोन गाड्यांना बेसावध गाठून मी सर्वांत डावीकडल्या लेनमध्ये.
एक्झिट २९.
आज बहुतेक सहा तास?....सहा?
बारा पर्यंततरी पोहोचायला हवं. गाडी दोन फूट पुढे.
हवा काय सहिये आज. दिवसभर मळभ नि जोरदार वारा.
थंडी सुरू होणार आता. नि मग बर्फ..
मरो...
आज हवा छान आहे. आत्ताच थोडा पाऊस झालाय. एक पातळसं ज॓केट पुरतंय.
मागची गाडी फारच लगट करतेय. गाडी तर अम्रू दिसतेय, अरेच्चा नि आतला माणूसही. भाऊ, नका फिरत जाऊ फार देसी लोकांबरोबर. कुठून लावून घेतलात हा वाण?
एक्झिट ३०.
अजून इथेच! कठीण आहे. परत जावं का? उद्या सकाळी निघू लवकर.
नको.
दिवस वाया जाईल. आत्ताच जाऊ. काय होईल ते होईल.
पण किती वेळ लागेल! नि फार रात्र होईल डोंगरदर्यांचे रस्ते येईपर्यंत. मग तिथे जंगलात एकटंच भुतासारखं जात रहायचं?
पहिल्यांदा तर जातोय रात्रीचा, कुणी पाहिलंय एकटेच असणारोत हे? आज जाऊन बघू मग पुढच्या वेळेस आपोआपच ठरवता येईल असल्या अडनिड्या वेळेला निघायचं का ते...
बरं...जाऊया पुढे...
अजून वेळ आहे पण मागे जायला...पण असो...
देखूँ जिधर भी इन राहों में
रंग पिघलतें हैं निगाहों में
ठंड़ी हवा है, ठंड़ी छाँव है...
दूर वह जाने किसका गाँव है...
बादल ये कैसा छाया
दिल यह कहाँ ले आया
सपना यह क्या दिखलाया है मुझको..
हर सपना सच लगे, जब प्रेम अगन जले
जो राह तू चले अपने मन की
हर पल की सीप से मोती ही तू चुने
जो तू सदा सुने अपने की...
यूँही चला चल राही....कितनी हसीन यह दुनिया है.....
एक्सिट ३१.
"पाऊस अल्लद
स्वप्नातल्या हिनकळ्या सावलीसारखा"...
एक थेंब, दोन थेंब....काचभर थेंब...
वायपर एकदा इकडून तिकडे...थेंब दूर. पाण्याचा एकसंध हलकासा थर...काच स्वच्छ....वायपर बंद.
एक थेंब, दोन थेंब....काचभर थेंब...
वायपर एकदा इकडून तिकडे...थेंब दूर. पाण्याचा एकसंध हलकासा थर...काच स्वच्छ....वायपर बंद.
चालूच राहू देत की वायपर.
नको. एवढाही नाही पडताहे पाऊस. हे बरंय...
तसं दुसरं काय आहे करण्यासारखं?
खेळत रहा...
...
भरली काच...वायपर...नको इतक्यात....अजून भरू देत...पण समोरचं काही दिसतंय तरी का?
समोरच्या करोलाचे मागचे लाल दिवे दिसताहेत. ह्याहून अधिक काहीही दिसणं गरजेचं नाहीये. नि त्या करोलातही कोणी बघण्यासारखं बसलं नाहीये!....
पानं कसली हिरवीगार आहेत झाडांची....निथळतोय हिरवा रंग....चकाचक....
आत्ताच न्हाऊन ओले केस घेऊन निवांत उभी आहेत...."सोज्वळ मोहकतेने..." टाईप....
फार दिवस नाही उरले...एखादं पान लालसर व्हायला लागलंयसुद्धा...पण झाडाला त्याचं काहीच नाही...क्षमाशीलता कशी भरल्या रंध्रारंध्रांत...
पाऊस कसा अलगद विसावलाय पानांत...दवालाही हेवा वाटेल...
देखो इन्हें ये हैं ओस की बूँदें
पत्तों की गोद में आसमाँ से कूदे
अंगड़ाई ले फिर करवट बदलकर
नाज़ूक से मोती हँस दे फिसलकर...
एक्झिट ३२.
मोरमॉन का काहीसं चर्च...हे लोक टेंपल म्हणतात बहुदा...कोण जातं त्यात हे कोडंच आहे...पण काहीतरी गोपनीय नि एकदम सो हायक्लास प्रकार आहे म्हणतात...ही जमात फार पैसेवाली आहे...ते तर त्या सोनेरी कळसांवरूनच दिसतंय म्हणा...रात्री काय सही दिसतं पण ते.....आत्ताही पावसाळी हवेत कशी स्पेशल वॉशची सफ़ेदी की चमकार डोळ्यात भरतेय...ह्यांच्यासाठी स्पेशल पाऊस पडतो? का आपला चारचौघांसाठी पडतो तोच, श्रीमंती प्रदूषणात विरघळलेला?
गाडी त्याला जाऊन धडकेल सरळ असं वाटतानाच आपण नेहमीसारखे त्या वळणावर....स्पीड लिमिट ५०....कुणासाठी? इथे ५ वर गाडी चालत नाहीये....असो...
बाय द वे....रस्त्याला कसलं बँकिंग आहे....ह्या सर्वांत डावीकडच्या लेनमधून डावीकडे वळताना...बाकीच्या लेनमधली वाहनं घरंगळून अंगावर पडतील असं वाटतंय....ते उल्हासनगरच्या जवळ रेल्वेगाड्या तिरक्या होतात ना वळताना...तितकं जाणवतंय....तरीच असल्या वळणावरही स्पीड लिमिट बरंच आहे...वळणावर असं निवांत थांबलं की कळतं ना एकेक...ते किती अवघड आहे नि ते आधीच कोणीतरी कसं सोपं करून ठेवलंय ते....वळणांवर थांबता आलं पाहिजे...नुसतं वेग कमी करून त्यांना टाळून जाण्यात अर्थ नाही!
अर्रर्र....निळी अ॓क्युरा मध्ये...इतकंही नकोय रमून जायला रस्त्यात...पण ठिक आहे तसाही त्या सोनेरी करोलाचा कंटाळाच आला होता...ही निळाई हवामानाला साजेशी आहे.
एक्सिट ३३.
शहराला कसा वाहनांचा वेढा पडलाय...शहराला विळखा घालून बसलेला हा रस्ता...नि त्यात अजगराच्या शरीरात उंदीर हळूहळू पुढे सरकावा, तितक्याच संथपणे सरकत असलेली वाहनं. रस्ता गिळून तृप्त. म्हणजे रोज ह्या वेळेला वरून स्नँपशॉट घेतला तर शहराला खरोखरीच वाहनांचा वेढा पडलाय असं दिसेल नाही?...पण रस्त्याने गिळलेली वाहनं नि वाहनांनी गिळलेली माणसं...शहरात काय होतंय ह्याबद्दल सोयरसुतक नसलेली. किंवा कदाचित असलेली पण आपली क्रयशक्ती हरवून बसलेली...
शहराला वेढा देऊन बसला असेल कुणी एक, आता ही नोकरी किती दिवस टिकतेय असा घरी जाताना विचार करत...कुणी आजच कदाचित पिंक स्लीप घेऊन घरी चालला असेल. उद्या कुठला रस्ता? असा विचार करत. शहराच्या आत त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी ७० कोटींच्या बळीचा बकरा कोण? ह्यावर काथ्याकूट करत असतील. अरे आज तर पीएम पण आत असतील, सकाळीच न्यूयॉर्कहून इथे येणारेत असं बरखा दत्त म्हणत होती खरी तिच्या च॓नेलवर...कुणाला तरी "उरका आता, निवडणुकीच्या प्रचाराला जायचंय," असं झालं असेल...कुणी तरी म्हणत असेल, "हे काय आणलंय १२३ कराराचं मध्येच....इथे घरचं झालंय थोडं!"..
त्या सगळ्यांना जाऊन सांगायचं...आत्ता एक बातमी आलीय, राजधानीला वेढा पडलाय...रनगाड्यांसारखी धुडं आहेत, ती अमेरिकन बनावटीचीच आहेत...पण जपानी, कोरियन बनावटीची सामग्री भरल्या नुसती. कारण कळत नाहीये. गोंधळ आहे काहीतरी. आपण तर इतक्यात कुठे मोठा हल्ला नाही केलाय, नाही? व्हाईट हाऊस ने सैन्यही आऊटसोर्स केलंय का हल्ली? व्हाईट हाऊस मध्ये पीएम साहेबांच्या ताफ्यातला कुणी गुल्टी अधिकारी चिंतेत पडेल, हे १२३ करार ठिकेय हो. पण आता माझ्या भाच्याकडे कसा जाऊ व्हर्जिनियात? ह्या पुढल्या इलिप्समध्ये एखादं हेलिकॉप्टर उतरवता येईल का हो? त्या मॉन्युमेंटवर न आपटता?
हिहि...
वेड लागलंय का?
अजून तीन मिनिटांत एक्झिट ३४ नाही आलं तर लागेल.
एक्झिट ३४.
इथं का जायचंय सगळ्यांना!...हुश्श...उगीच वाट अडवून बसलेत मागच्यांची...
५, १०, १५, २५, ४०, ५५, ६५...स्पीडलिमिट अधिक दहा...पुरे!
विस्कटलेला ट्र॓फिक...
शहाणपण शाबूत...
उंदीर वेगात पुढे...
बहुदा साडे पाचच तास...
अर्थहीन विचारांच्या वेढयातून सुटका...
एक्झिट ३७.
ब्रेक...
धत्....क्षणभंगुर...हेसुद्धा?
(क्रमशः)
एक्झिट २८.
शेवटी एकदाची गाडी हो नाही हो नाही करत वाहनांच्या गर्दीत.
निळ्या फोर्डचे आभार आत येऊ दिल्याबद्दल. संध्याकाळच्या पाच वाजता घर सोडलं तेव्हाच वाटलं होतं की, ट्र॓फिक आज जीव खाणार. पण इलाज नाही.
किती वेळ लागेल पोहोचायला आज?
सगळं सुरळित असताना साडेचार तास लागतात. आज पाच?
आत शिरल्यापासून ब्रेकवरचा पाय जसाच्या तसा...
मग थोडा हिय्या करून नि शेजारच्या लेनमधल्या एकदोन गाड्यांना बेसावध गाठून मी सर्वांत डावीकडल्या लेनमध्ये.
एक्झिट २९.
आज बहुतेक सहा तास?....सहा?
बारा पर्यंततरी पोहोचायला हवं. गाडी दोन फूट पुढे.
हवा काय सहिये आज. दिवसभर मळभ नि जोरदार वारा.
थंडी सुरू होणार आता. नि मग बर्फ..
मरो...
आज हवा छान आहे. आत्ताच थोडा पाऊस झालाय. एक पातळसं ज॓केट पुरतंय.
मागची गाडी फारच लगट करतेय. गाडी तर अम्रू दिसतेय, अरेच्चा नि आतला माणूसही. भाऊ, नका फिरत जाऊ फार देसी लोकांबरोबर. कुठून लावून घेतलात हा वाण?
एक्झिट ३०.
अजून इथेच! कठीण आहे. परत जावं का? उद्या सकाळी निघू लवकर.
नको.
दिवस वाया जाईल. आत्ताच जाऊ. काय होईल ते होईल.
पण किती वेळ लागेल! नि फार रात्र होईल डोंगरदर्यांचे रस्ते येईपर्यंत. मग तिथे जंगलात एकटंच भुतासारखं जात रहायचं?
पहिल्यांदा तर जातोय रात्रीचा, कुणी पाहिलंय एकटेच असणारोत हे? आज जाऊन बघू मग पुढच्या वेळेस आपोआपच ठरवता येईल असल्या अडनिड्या वेळेला निघायचं का ते...
बरं...जाऊया पुढे...
अजून वेळ आहे पण मागे जायला...पण असो...
देखूँ जिधर भी इन राहों में
रंग पिघलतें हैं निगाहों में
ठंड़ी हवा है, ठंड़ी छाँव है...
दूर वह जाने किसका गाँव है...
बादल ये कैसा छाया
दिल यह कहाँ ले आया
सपना यह क्या दिखलाया है मुझको..
हर सपना सच लगे, जब प्रेम अगन जले
जो राह तू चले अपने मन की
हर पल की सीप से मोती ही तू चुने
जो तू सदा सुने अपने की...
यूँही चला चल राही....कितनी हसीन यह दुनिया है.....
एक्सिट ३१.
"पाऊस अल्लद
स्वप्नातल्या हिनकळ्या सावलीसारखा"...
एक थेंब, दोन थेंब....काचभर थेंब...
वायपर एकदा इकडून तिकडे...थेंब दूर. पाण्याचा एकसंध हलकासा थर...काच स्वच्छ....वायपर बंद.
एक थेंब, दोन थेंब....काचभर थेंब...
वायपर एकदा इकडून तिकडे...थेंब दूर. पाण्याचा एकसंध हलकासा थर...काच स्वच्छ....वायपर बंद.
चालूच राहू देत की वायपर.
नको. एवढाही नाही पडताहे पाऊस. हे बरंय...
तसं दुसरं काय आहे करण्यासारखं?
खेळत रहा...
...
भरली काच...वायपर...नको इतक्यात....अजून भरू देत...पण समोरचं काही दिसतंय तरी का?
समोरच्या करोलाचे मागचे लाल दिवे दिसताहेत. ह्याहून अधिक काहीही दिसणं गरजेचं नाहीये. नि त्या करोलातही कोणी बघण्यासारखं बसलं नाहीये!....
पानं कसली हिरवीगार आहेत झाडांची....निथळतोय हिरवा रंग....चकाचक....
आत्ताच न्हाऊन ओले केस घेऊन निवांत उभी आहेत...."सोज्वळ मोहकतेने..." टाईप....
फार दिवस नाही उरले...एखादं पान लालसर व्हायला लागलंयसुद्धा...पण झाडाला त्याचं काहीच नाही...क्षमाशीलता कशी भरल्या रंध्रारंध्रांत...
पाऊस कसा अलगद विसावलाय पानांत...दवालाही हेवा वाटेल...
देखो इन्हें ये हैं ओस की बूँदें
पत्तों की गोद में आसमाँ से कूदे
अंगड़ाई ले फिर करवट बदलकर
नाज़ूक से मोती हँस दे फिसलकर...
एक्झिट ३२.
मोरमॉन का काहीसं चर्च...हे लोक टेंपल म्हणतात बहुदा...कोण जातं त्यात हे कोडंच आहे...पण काहीतरी गोपनीय नि एकदम सो हायक्लास प्रकार आहे म्हणतात...ही जमात फार पैसेवाली आहे...ते तर त्या सोनेरी कळसांवरूनच दिसतंय म्हणा...रात्री काय सही दिसतं पण ते.....आत्ताही पावसाळी हवेत कशी स्पेशल वॉशची सफ़ेदी की चमकार डोळ्यात भरतेय...ह्यांच्यासाठी स्पेशल पाऊस पडतो? का आपला चारचौघांसाठी पडतो तोच, श्रीमंती प्रदूषणात विरघळलेला?
गाडी त्याला जाऊन धडकेल सरळ असं वाटतानाच आपण नेहमीसारखे त्या वळणावर....स्पीड लिमिट ५०....कुणासाठी? इथे ५ वर गाडी चालत नाहीये....असो...
बाय द वे....रस्त्याला कसलं बँकिंग आहे....ह्या सर्वांत डावीकडच्या लेनमधून डावीकडे वळताना...बाकीच्या लेनमधली वाहनं घरंगळून अंगावर पडतील असं वाटतंय....ते उल्हासनगरच्या जवळ रेल्वेगाड्या तिरक्या होतात ना वळताना...तितकं जाणवतंय....तरीच असल्या वळणावरही स्पीड लिमिट बरंच आहे...वळणावर असं निवांत थांबलं की कळतं ना एकेक...ते किती अवघड आहे नि ते आधीच कोणीतरी कसं सोपं करून ठेवलंय ते....वळणांवर थांबता आलं पाहिजे...नुसतं वेग कमी करून त्यांना टाळून जाण्यात अर्थ नाही!
अर्रर्र....निळी अ॓क्युरा मध्ये...इतकंही नकोय रमून जायला रस्त्यात...पण ठिक आहे तसाही त्या सोनेरी करोलाचा कंटाळाच आला होता...ही निळाई हवामानाला साजेशी आहे.
एक्सिट ३३.
शहराला कसा वाहनांचा वेढा पडलाय...शहराला विळखा घालून बसलेला हा रस्ता...नि त्यात अजगराच्या शरीरात उंदीर हळूहळू पुढे सरकावा, तितक्याच संथपणे सरकत असलेली वाहनं. रस्ता गिळून तृप्त. म्हणजे रोज ह्या वेळेला वरून स्नँपशॉट घेतला तर शहराला खरोखरीच वाहनांचा वेढा पडलाय असं दिसेल नाही?...पण रस्त्याने गिळलेली वाहनं नि वाहनांनी गिळलेली माणसं...शहरात काय होतंय ह्याबद्दल सोयरसुतक नसलेली. किंवा कदाचित असलेली पण आपली क्रयशक्ती हरवून बसलेली...
शहराला वेढा देऊन बसला असेल कुणी एक, आता ही नोकरी किती दिवस टिकतेय असा घरी जाताना विचार करत...कुणी आजच कदाचित पिंक स्लीप घेऊन घरी चालला असेल. उद्या कुठला रस्ता? असा विचार करत. शहराच्या आत त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी ७० कोटींच्या बळीचा बकरा कोण? ह्यावर काथ्याकूट करत असतील. अरे आज तर पीएम पण आत असतील, सकाळीच न्यूयॉर्कहून इथे येणारेत असं बरखा दत्त म्हणत होती खरी तिच्या च॓नेलवर...कुणाला तरी "उरका आता, निवडणुकीच्या प्रचाराला जायचंय," असं झालं असेल...कुणी तरी म्हणत असेल, "हे काय आणलंय १२३ कराराचं मध्येच....इथे घरचं झालंय थोडं!"..
त्या सगळ्यांना जाऊन सांगायचं...आत्ता एक बातमी आलीय, राजधानीला वेढा पडलाय...रनगाड्यांसारखी धुडं आहेत, ती अमेरिकन बनावटीचीच आहेत...पण जपानी, कोरियन बनावटीची सामग्री भरल्या नुसती. कारण कळत नाहीये. गोंधळ आहे काहीतरी. आपण तर इतक्यात कुठे मोठा हल्ला नाही केलाय, नाही? व्हाईट हाऊस ने सैन्यही आऊटसोर्स केलंय का हल्ली? व्हाईट हाऊस मध्ये पीएम साहेबांच्या ताफ्यातला कुणी गुल्टी अधिकारी चिंतेत पडेल, हे १२३ करार ठिकेय हो. पण आता माझ्या भाच्याकडे कसा जाऊ व्हर्जिनियात? ह्या पुढल्या इलिप्समध्ये एखादं हेलिकॉप्टर उतरवता येईल का हो? त्या मॉन्युमेंटवर न आपटता?
हिहि...
वेड लागलंय का?
अजून तीन मिनिटांत एक्झिट ३४ नाही आलं तर लागेल.
एक्झिट ३४.
इथं का जायचंय सगळ्यांना!...हुश्श...उगीच वाट अडवून बसलेत मागच्यांची...
५, १०, १५, २५, ४०, ५५, ६५...स्पीडलिमिट अधिक दहा...पुरे!
विस्कटलेला ट्र॓फिक...
शहाणपण शाबूत...
उंदीर वेगात पुढे...
बहुदा साडे पाचच तास...
अर्थहीन विचारांच्या वेढयातून सुटका...
एक्झिट ३७.
ब्रेक...
धत्....क्षणभंगुर...हेसुद्धा?
(क्रमशः)
Subscribe to:
Posts (Atom)